Showing posts with label अनुभव. Show all posts
Showing posts with label अनुभव. Show all posts

Thursday, July 28, 2016

एका मुलीची गोष्ट

काल रात्रशाळेत स्कूल बॅग वाटपाचा कार्यक्रम झाला. याच निमित्ताने एका सरांशी भेट झाली. एखाद्या सहज भेटीत अगदी सहज बोलता-बोलता काय ऎकायला मिळेल याबद्दल अंदाज बांधणं खरच अवघड.

कोकणातील एका अगदी लहानशा  गावात ते सर कार्य करतात. तिथे कार्य करत असताना आलेले अनुभव ते आमच्याशी share करित होते. जे काही त्यांनी आम्हाला सांगितलं ते फार भयंकर होतं.

कोकणातील मुले खूप हुशार आहेत. त्यांच्यात गुणवत्ता ठासून भरली आहे, पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही ही खंत आहे. याशिवाय ज्या गावात ते काम करतात त्या गावात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पोषक वातावरण नाही. वगैरे वगैरे गोष्टी ते सांगत होते. त्यापुढे ते म्हणाले की कोकणात लैंगिक शोषण हि देखील फार मोठी समस्या आहे. आणि ह्याच मुद्द्याला धरुन त्यांनी एक अनुभव सांगितला, जो ऎकून आम्ही अवाक झालो.

६ वी इयत्तेमध्ये एक मुलगी शिकत होती. तिच्या वर्गावर बाई शिकवायला आल्या तर ती normal असे पण तेच जर सर आले तर अक्षरशः थरथर कापायची आणि अंग चोरून राहायची. तिचा नक्की काय problem आहे हे कोणाच्या लक्षात येत नव्हते. शेवटी त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली गेली आणि जे काही सत्य बाहेर आले ते फारच भयानक होते.

तिच्या आजीने तिला असे सांगितले होते कि परपुरुषाचा नुसता स्पर्श जरी झाला तरी बाई गरोदर राहते. तेव्हा कुणाही पुरूषाला तू स्वतःला स्पर्श करू देऊ नकोस. हे ऎकून सर्वांना धक्का बसला. का तिच्या आजीने तिला अशी आणि इतकी चुकीची माहिती दिली असावी यासाठी अधिक माहिती काढली असता असे लक्षात आले की तिच्या आत्याने आंतरजातीय विवाह केला होता जो  आजीला पसंत नव्हता. त्यानंतर तिची आत्या गरोदरपणात घरी आली होती तेव्हा आजीने तिच्याकडे बोट दाखवून त्या मुलीला हे सर्व सांगितले.

त्या मुलीवर व्यवस्थित उपचार केले गेले, हळू हळू ती सावरली ९ वि मध्ये ती पूर्ण बरी झाली आणि १० वि च्या परीक्षेत ९४% गूण मिळवले.

परंतू, तिचं नशीब चांगलं म्हणून शिक्षकांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी योग्य ती पावलं उचलून तिला त्यातून बाहेर काढले. पण एक क्षणभर आपण धरुन चालू की समजा शिक्षकांनी पुढाकार घेऊन हे सर्व केलं नसतं तर??? न जाणे अजून किती काळ ती मुलगी चुकीच्या समजूतीतच राहिली असती.

तिच्या आजीचा हेतू स्पष्ट कळतो की, जे त्या मुलीच्या आत्याने केले ते हिने करू नये म्हणून आजीने तिला त्यापासून कायमस्वरूपी परावृत्त करण्यासाठी हे सर्व केले. पण आजीने तिच्या कोवळ्या मनाचा जराही विचार न करता हे सर्व केल्याने तिला किती मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. अशी चुकीची माहिती या वयातल्या मुला-मुलींना देणं म्हणजे त्यांच्या आयुष्याशी खेळण्यासारखंच आहे.

Thursday, July 14, 2016

दगड ग्रुप

होय आम्ही दगड आहोत .
दुसर्यांच्या दुखः वर स्वताचे मनोरंजन करून आपले दुखः लपवणारे आम्ही दगड आहोत .
अभ्यास करायला घरी जागा नाही म्हणून उद्यानात दिव्याखाली  दगडावर बसून अभ्यास करणारे आम्ही दगड आहोत .पैसे नाहीत म्हणून क्लास न करता दुसर्याच्या नोटस वापरणारे आम्ही दगड आहोत .पेपरच्या आधी समोरच्या सिद्धीविनायकाचे आशीर्वाद न घेता teliphone बूथ चालविणाऱ्या अंधाच्या शिव्या खावून जाणारे आम्ही दगड आहोत .राजकीय  पक्षांचे  banner चटई म्हणून वापरणारे आम्ही दगड आहोत garden मध्ये अभ्यासात कोणाला काही अडचण आल्यास त्याला मदत करणारे आम्ही दगड आहोत .मित्रांसाठी वेळी अवेळी धावून जात त्यांना मदत करणारे आम्ही दगड आहोत .आज तीच दगडे  परिस्तिथी शी सामना करत ,लढत मोठे झालेत ,समाजात मान्यवर व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत ,पण ते garden मधील त्या दगडाला विसरले नाहीत .अजूनही एकत्र येतो आणि सुरु होते तीच भंकस ,तीच मस्ती ,अजूनही हालाकीच्या परीस्तीतीत अभ्यास करणाऱ्या मुलांबद्दल सहानभूती ,आपुलकी आहे म्हणूनच स्वताच्या  पदरचे  पैसे  भरून रात्रशाळेत शिकणाऱ्या ९ वि आणि १० वीच्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटतो .असाच आहे आमचा दगड ग्रूप

सुनीता

कॉलेज च्या क्लार्क् मध्ये  २ महिन्यासाठी कोणतरी रजेवर गेले आणि ती त्याजागी आली .आम्ही दुसर्या वर्षाचे विद्यार्थी ,पण तिला म्याडम कधीच म्हटले नाही .बाहुली सारखी दिसणारी  ,५' उंचीची ,लांब केस ,एक वेणी घालणारी ,आणि हळुवार गोड आवाजात बोलणारी  सुनिता .आम्ही तिच्यापेक्षा ५/६ वर्षांनी लहान ,पण दोस्ती जुळल्यावर वयाचा प्रश्नच कधी आला नाही ,तिच्या बरोबर दुसरी मैत्रीण संगीता ,.खूप बडबड करणारी .छान ग्रुप जमला आमचा ,खूप धमाल केली तेव्हा ,एकमेकांच्या घरी जाने ,एकत्र जेवणे ,सिनेमा बघणे ,आणि गप्पाच्या मैफिली जमवल्या .आणि २ महिन्यानंतर नोकरी सुटताच ती गायब झाली .सर्व आठवणी मागे सोडून ,खूप शोधले तिला ,पण कुठलाही संपर्क होवू शकला नाही .अगदी परवापर्यंत .ठाणे स्टेशनावर जुन्या शिक्षिका भेटल्या .अर्थात मी त्यांना आठवतच नव्हतो पण जुन्या आठवणी सांगितल्या आणि ओळख पटली .मग तिने सुनीताचा नंबर दिला .आणि इतर काही जणींचा .मग मी तिला भीत भीत च पहिला मेसेज पाठविला .आणि संध्याकाळी तिचा फोन आला .तिने स्पष्ट सांगितले तुझा चेहरा आठवत नाही .मग जुन्या आठवणी जाग्या झाल्या आही हळू हळू सर्व आठवले .मग अजून २/३ मित्र मैत्रिणी एकत्र झालो .आणि ग्रुप बनला .तिचे आपलेपणाचे बोलणे ऐकून असे वाटले कि मधली वर्षे गायबच झाली नव्हती .अजूनही आम्ही १९९० च्या काळातच आहोत .मग तिच्या घरी आम्ही ४ जन जमलो .ओल्ड इज गोल्ड ,जुन्या आठवणी जागल्या ,डोळे पाणावले .जणू मधला काळ गेलाच नव्हता .खरेच यालाच म्हणतात का खरी ,सच्ची मैत्री ,देव तुला खूप सुखात ठेवो सुनिता .

कृष्णा बोरकर

साल २००९..... ते झी गौरव पुरस्काराचे १० वे वर्ष होते. नाटक आणि चित्रपटाची नामांकने जाहीर झाली होती, सर्व जण या सोहळ्याची उत्सुकतेने वाट पहात होते.चंद्रलेखाच्या चेहरा मोहरा या नाटकाला नामांकन नव्हते, तरीही नाट्यविभागाचे परीक्षक श्री. सुरेश खरे यांनी खास नाटकाच्या रंगभूषेला नामांकन नसतानाही खास  पारितोषिक देण्याची शिफारस आयोजकांना केली होती आणि ती मान्य देखील झाली.

त्या नाटकात प्रमुख कलाकाराचा चेहरा कमीत कमी वेळात पूर्णपणे बदलून टाकण्याची किमया ज्येष्ठ  रंगभूषाकार श्री. कृष्णा बोरकर यांनी केली होती आणि म्हणूनच ते परीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरले होते. अनधिकृतरीत्या बोरकरांना परितोषिकबद्दल कळले होतेच आता तो कधी जाहीर होणार याची फक्त वाट पहायची होती.

अचानक एके दिवशी संध्याकाळी सुप्रिया विनोद हीचा बोरकरांना फोन आला "काका तुम्ही कुठे आहात, आता इथे झी गौरव पुरस्कार सोहळा  चालू आहे आणि तुमच्या नावाची पुरस्कारासाठी घोषणा झाली, पण तुम्ही हजर नव्हता म्हणून मी तो तुमच्यावतीने स्वीकारला. बोरकरांना धक्काच बसला, अरे हे काय ?? आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले पण अशापद्धतीने कधीच वागणूक मिळाली नव्हती. त्यांनी या गोष्टीचा निषेध करायचा निर्णय घेतला पण त्यांना इतर मान्यवरांनी समजावले आणि मोठ्या मनाने माफ करण्याचा सल्ला दिला. बोरकरांनीही यागोष्टीबद्दल जास्त चर्चा केली नाही.शेवटी झी परिवारानेही आपली चूक मान्य केली आणि २ दिवसांनी घरी येऊन हा पुरस्कार बोरकारांना प्रदान करण्यात आला.

Tuesday, July 12, 2016

मैत्री

किरण राणे - सावंत ,इयत्ता ३ री आणि ४ थी ला माझ्या बाजूला बसायची ,घाबरट आणि सहनशील स्वभाव त्यामुळे तिला छळायला खूप मजा वाटायची ,पुढे ५ वीत वेगळे झालो आणि तिला  विसरून गेलो .पुढे नवीन मित्र आणि मैत्रिणी भेटल्या पण मनाच्या एका कोपर्यात कधीतरी आठवायची ,आणि स्वतः हसायचो .६ महिन्यापूर्वी शाळेतले जुने मित्र भेटलो आणि एक जण म्हणाला अरे किरण तुझी आठवण काढते .मग तिच्याबरोबर पुन्हा संपर्क झाला आणि chating  सुरु झाले ,वेळ नसल्यामुळे प्रत्यक्ष भेट होत नव्हती .रोज तिच्या शिव्या खायचो शेवटी आज योग आला आणि तिच्या घरी आम्ही दोघे मित्र गेलो ,दरवाजा उघडला तिने आणि तिच्या चेहऱ्यावरचे निखळ आणि निर्व्याज्य मैत्रीचे भाव पाहून मधली ३४ वर्षे कशी उडून गेली ते कळलेच नाही .तिने स्वतः बनविलेला केक खाल्ला आणि त्यातील मैत्रीचा गोडवा पुढील आयुष्यभर जिभेवर रेंगाळत राहील हे नक्की .किरण भावी आयुष्य तुला आणि तुझ्या परिवाराला खूप खुख समाधान आणि आनंद देवो हीच प्रार्थना आमच्यातर्फे करतो .

स्टार्ट गिविंग

शासकीय तंत्रनिकेतन ठाणे ,येथून १९९२ ला बाहेर पडलो आणि ज्याने त्याने आपला मार्ग निवडला .तसे प्रत्येकजण कोणाच्या ना कोणाच्या संपर्कात होताच .आम्ही काहीजण ३ महिन्यातून एकदा भेटायचो .फेसबुक आणि व्हात्स अप मुळे सगळे एकत्र आलो .मग सुरु झाले अमर्यादित chatting .कधीतरी सहल ,स्नेह संमेलन ,अचानक कोणीतरी एक दिवस प्रश्न केला कि मोठी प्रसिद्ध माणसे समाजासाठी काय करतात .तर दुसर्याचा ताबडतोब प्रती प्रश्न अरे xxxx तू काय करतोस समाजासाठी ????झाले सुरु झाले सर्वांचे वाद विवाद आणि ठरले आतापर्यंत समाजाकडून घेतच राहिलो आता वेळ आलीय काहीतरी समाजाला परत देण्याची .मग त्यानिमित्ताने परत एकत्र आलो सगळे आणि एक निर्णय घेतला ,आपल्या कुवतीनुसार शिक्षण क्षेत्रात काहीतरी करू .हीच वेळ आहे सामाजिक ऋण फेडण्याची .आणि एकमेकांच्या विश्वासावर उभी राहिली स्टार्ट गिविंग फौंडेशन .मुलांना शाळेत आणण्यासाठी जे काही योग्य असेल ते उपलब्ध करून त्यांना शिक्षणाची गोडी लावावी हे प्रमुख सूत्र समोर ठेवून कामाला सुरवात केली .आम्हाला माहित आहे कि हे काही मोठे कार्य नाही पण जे काही करू ते एकमेकांच्या विश्वासावर आणि योग्य मार्गाने करू .

Monday, July 11, 2016

सखी

हैप्पी वेलेन्ताई डे ,खरे म्हणजे माझे तुझ्यावर किती प्रेम आहे हे कधीच मी मोजलेच नाही कारण मी नेहमी तुला गृहीत धरत राहतो .पण आपली जेव्हा भांडणे आणि वाद होतात आणि त्यानंतर जो अबोलपणा असतो त्यामध्ये जाणवते माझे तुझ्यावर किती प्रेम आहे .स्वतःचे घर सोडून माझ्याकडे आलीस त्याचवेळी तुझी स्वप्ने ,सुख ,दुख माझी झाली .तुझ्या डोळ्यातली स्वप्न पूर्ण करणे हा माझ्या आयुष्याचा भाग झाला ,माझे रागावणे ,झिडकारण तू सहन केलेस .माझ्या उनाड ,भटक्या ,बेधुंध आयुष्याला गवसणी घालून योग्य दिशा दाखविण्याचे काम केलेस .हळू हळू का होयीना आपण पाहिलेली स्वप्ने पूर्ण होतायत .ती पूर्ण होताना तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला बळ देतोय तो आनंदी चेहरा मनात साठवून ठेवत नव्या उमेदीने पुढे जातोय .हे प्रत्यक्ष तुझ्या समोर बोलू शकत नाही कारण डोळ्यात येणारे अश्रू तुला दाखवायचे नाहीत .thank you to become अ पार्ट ऑफ माय life .love you dear

Saturday, July 9, 2016

भूत

बहुतेक मोठ्या कंपन्यांचे कारखाने हे विस्तीर्ण जागेत पसरलेले असतात .त्यामुळे त्यांच्या जागेबाबत हि अनेक आख्यायिका पसरलेल्या असतात .सर्वच ठिकाणी तिन्ही पाळ्या काम चालू असते त्यामुळे वेगवेगळ्या अफवाचे पीक उगवत असते .भुताखेतांच्या गोष्टीहा सर्वांच्या आवडीचा विषय .प्रत्येक कारखान्यात एखादे तरी भूत फिरतच असते .काही ठिकाणी ती बाई असते तर काही ठिकाणी 7 फूट उंचीचा माणूस .जो तो प्रसंगानुसार भूत बदलतो .मला आठवतय मी मुंबई एके ठिकाणी कामाला होतो त्या बाजूला मुस्लिम स्मशानभूमी होती.पण तिथे कधीच मुस्लिम भूत दिसले नाही पण एक बाई हमखास फिरायची असे बरेचजण बोलायचे .मी अनेक वेळा रात्रपाळी करायचो .मध्यरात्री ,पहाटे पूर्ण  कंपनीभर फिरायचो पण एकदाही ती बाई दिसली नाही.आमच्या एका बॉयलर अटेंडंट चा अकाली मृत्यू झाला होता तेव्हा इतर अटेंडंट सांगायचे कि तो आजूबाजूला असल्याचा भास होतो .पण मला कधी जाणवले नाही .कदाचित हे सर्व आपल्या मनावर अवलंबून असेल.हो पण राऊंड मारताना हे सर्व मनात आले कि एक प्रकारची भीती मनामध्ये दाटून यायची आणि अश्यावेळी मी तो राऊंड पूर्ण न करताच मागे फिरायचो .मी हे सर्व हसण्यावारी नेतो म्हणून मला कधी या गोष्टी चा त्रास झाला नसेल .झी वाहिनीवर रात्री रात्रीस खेळ चाले हि मालिका सुरु आहे त्यावरून हे आठवले .

Friday, July 8, 2016

स्टार्ट गिविंग

हल्ली बऱ्याच ठिकाणी मी पहिले आहे कि बरेचजण घरी कॉम्पुटर असूनही गरजेनुसार लॅपटॉप विकत घेतात ,ती एक कामाची गरज असू शकते ,आणि त्यांचा घराचा कॉम्पुटर असाच पडून राहतो ,महिनोंमहिने त्याचा वापर होत नाही ,आमच्या फाऊंडेशनच्या एका सभासदाला अशी कल्पना सुचली कि का नाही तो कॉम्पुटर कोणा गरीब विद्यार्थ्याला भेट द्यावा ,जेणेकरून त्याला कॉम्पुटरची ओळख होईल आणि भविष्यात त्याचा उपयोग होईल ,त्याने हि योजना अमलात आणली आणि मुरबाड येथील आदिवासी शाळेला तो कॉम्पुटर भेट देण्याचे ठरविले ,मला वाटते या गोष्टीचा सर्वांनी विचार करावा .3 ते 4 हजार रुपयाला तो कॉम्पुटर विकण्यापेक्षा आजूबाजूच्या ओळखीच्या गरीब विद्यार्थ्याला द्या ,हा विचार करू नका कि तो योग्य रीतीने वापरेल कि नाही ,आज संगणक हि एक गरज बनली आहे आणि अनेकांच्या घरी अजूनही ती गोष्ट दूर आहे,तुमची हि भेट एखाद्याचे आयुष्य बदलू शकते ,बघा आम्ही सुरवात केली आहे तुम्ही कधी करणार ??????   LET'S START GIVING

महानगर

सुमारे 30 वर्षांपूर्वी व.पु.चे महानगर असा कथासंग्रह वाचा होता .नाव  कदाचित वेगळेही असेल ,पण त्यात एक कथा होती .लोकल ट्रेन मधून प्रवास करणाऱ्यांची ती कथा होती ,रोज प्रत्येक ग्रुप मध्ये कोणतरी स्वतःचे दुःख बोलता बोलता सांगून जायचा त्याच वेळी तिथे असलेला माणूस स्वतःचे दुःख समोरच्या माणसाच्या दुःख पेक्षा किती मोठे आहे आणि तरीही मी जगतो आहे हे सांगायचा. ते ऐकून समोरचा स्वतःचे दुःख विसरून त्याला सहानुभूती द्यायचा ,दुसऱ्या दिवशी तो माणूस दुसऱ्या लोकल मध्ये असायचा ,सेम गोष्ट ,आपले दुःख समोरच्याच्या दुखापेक्षा किती मोठे आहे हे सांगून लोकांची सहानुभूती घ्यायचा.लेखक एकदा त्या माणसाचा पाठलाग केलातेव्हा स्टेशन बाहेरच्या आपल्या मर्सिडीज मध्ये बसून तो माणूस निघून गेला.दुसऱ्या दिवशी परत लोकल मध्ये त्या माणसाचे दुःख सुरु झाले ,तुमच्यापेक्षा माझ्या जीवनात किती प्रॉब्लेम आहेत ,किती अडचणी आहेत वैगेरे.लेखकाने त्याला नंतर बाजूला घेऊन विचारले तुम्ही असे का करता ??त्याने उत्तर दिले कि मी खूप श्रीमंत माणूस आहे ,मला कोणतेही दुःख नाही .पण मी मध्यमवर्गीयांच्या लोकल ट्रेन मधून प्रवास करतो आणि त्यांची दुःखे ,अडचणी ऐकून घेतो ,मी प्रत्येकाला मदत करू शकत नाही,मग काय करता येईल आपल्याला हा विचार केला ,तेव्हा लक्षात आले कि काहीवेळ का होईना आपण त्यांचे दुःख विसरवू शकतो ,मग त्यांच्या अडचणी ,दुःख पेक्षा स्वतःची दुःखे सांगूलागलो तीही त्यांच्यापेक्षा मोठीच,लोक स्वतःची प्रॉब्लेम विसरून मला सहानुभूती देऊ लागले ,म्हणाले आहो आम्ही बरे तुमच्यापेक्षातुमच्या शिवाय कोणालाही माहित नाही मी कोण आहे ,कृपा करून कोणाला सांगू हि नका.
आज काही काळ का होईना लोक स्वतःची दुःखे विसारतायत .असे बोलून तो दुसऱ्या लोकल मध्ये चढला ,आज इतकी वर्ष झाली ते पुस्तक वाचून पण हि गोष्ट अजून हि माझ्या लक्षात आहे ,किती छोट्या छोट्या गोष्टी आहेतया जगात दुःखे हलके करण्याच्या .व.पु. आणि श.ना. यांचे हेच वैशिट्य आहे.ते आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून बरेच काही शिकवितात .व.पु. ची हि कथा मला खूप काही शिकवून गेली .आजही मी हि कथा मित्रांमध्ये सांगतो.

Tuesday, July 5, 2016

कृष्णा बोरकर

     साल १९७७.... नाट्यक्षेत्रातील फिल्मफेअर समजला जाणारा नाट्यदर्पण सोहळा रवींद्र नाट्य मंदिरात चालू होता. त्यावेळी अतिशय कमी बक्षीस समारंभ साजरे होत.  त्यामुळे नाट्यदर्पण ला एक मानाचे स्थान मराठी रंगभूमीवर होते.
      अतिशय प्रतिष्ठेच्या या सोहळ्याला सगळी मराठी नाट्यसृष्टी उपस्थित होती. सगळ्यांना उत्सुकता होती ती  या वर्षीच्या "मॅन ऑफ  द इयर "या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर कोण आपली मोहर उमटवितो याची. कारण हा पुरस्कार कोणाला मिळणार याची कल्पना फक्त आयोजकानाच असे. बाकी कोणालाही माहित नसे.
आणि...... अचानक रंगमंचावर काळोख झाला.
      थोड्यावेळाने एक स्पॉट लाईट एका गृहस्थावर स्थिरावला. आयोजक त्या गृहस्थाला स्वतः रंगमंचावर घेऊन आले.  सडपातळ देह, जाड भिंगाचा चष्मा, अत्यंत साधी रहाणी असे रंगभूषाकार  श्री. कृष्णा बोरकर भांबावलेल्या अवस्थेत रंगमंचावर उभे होते. त्या वर्षीच्या मॅन ऑफ द इयर पुरस्कारासाठी त्यांचीच निवड झाली होती. मराठी रंगभूमीवरच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पडद्यामागील कलाकाराचा इतका मोठा गौरव नाट्यदर्पणने केला होता.त्यामागची  कारणेही तशीच होती.
      प्रा. मधुकर तोरडमल यांचे "गुड बाय डॉक्टर" हे नाटक रंगभूमीवर तुफान चालत  होते आणि त्यामध्ये तोरडमलांची रंगभूषाकार बोरकरांनी केलेली रंगभूषा हा चर्चेचा विषय बनली होती. रंगमंचावर डॉक्टरांची  एन्ट्री होताच प्रेक्षकातून किंकाळ्या उमटत इतकी हिडीस चेहऱ्याची  रंगभूषा बोरकरांनी केली होती.डॉक्टरांचे कुबडेपण, त्यांचे  पुढे आलेले दात, चेहऱ्यावरचं व्रण हे इतके हुबेहूब होतं की प्रेक्षक घाबरून जायचे. प्रक्षकांमधून किंकाळ्या ऎकू येत. त्यांच्या ह्या रंगभूषेला दाद म्हणूनच त्यांना  हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना देण्यात आला आणि मुख्य नाट्यदर्पणने हे जे पाऊल उचलले त्यामुळे पडद्यामागील कलाकारांचे  योगदान व कष्ट सर्वांच्या लक्षात येऊ लागले आणि त्यानंतर पडद्यामागील कलाकारांनाही पुरस्कार देणे चालू झाले.

शाळा

         शाळेत जाण्यात तो कधीच खुश नसायचा , युनिफॉर्म घालायची वेळ आली कि तो गंभीर बनायचा, मग हळू हळू डोळ्यातून अश्रू बाहेर पडायचे ,खूप जीव तुटायचा माझा ,कारण शाळेत पोचवायची जबाबदारी माझीच होती ना ,त्यांच्यासाठीच बऱ्याच वेळ 2 री आणि 3 री पाळी घ्यायचो मी.मग रस्त्यावरून चालताना सारखे समजावत शाळेच्या गेट पर्यंत पोचवायचो ,तो पर्यंत  तो माझे ऐकायचा मान  डोलाऊन रडणार नाही असे सांगायचा ,पण हाथ सुटला कि परत रडगाणे सुरूच ,मग मीहि दाटल्या कंठाने घरी यायचो,सतत तीन महिने हे चालू होते ,त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी नेहमीच शाळेचा पहिला दिवस होता तो ,सर्व मुले आता शाळेला सरावली होती पण हाच एकमेव होता ,कधी तो शांत होणार हेच कळत नव्हते .
      आणि अचानक तो एक दिवस आला ,त्या दिवशी काही कामानिमित्त मी शाळेत सोडायला गेलो नाही आणि त्याने गोंधळ केला ,दुपारी नेहमी प्रमाणे त्याला आणायला वर्गात गेलो तेव्हा मावशी बोलली आज दिवसभर रडत होता ,इतका कि टीचर नी त्याला पूर्णवेळ वर्गाबाहेर बसविले ,ऐकून माझी हि सहनशक्ती संपली ,बाहेर येऊन पहिल्यांदाच बापाचा खरा आवाज बाहेर काढला ,निव्वळ डोळे आणि हावभावावरून कळले आता काय घडणार आहे ,त्याचा चेहरा अधिक केविलवाणा झाला .घरी येऊन पहिल्यांदाच दमात घेतले त्याला .त्या दिवसापासून आज पर्यंत शाळेत जाताना कधीच रडला नाही .
        मला त्याच्या टीचरला धन्यवाद दिले पाहिजे .खरेच त्या बाईने शेवटपर्यंत माझ्याकडे कधीच त्याची तक्रार केली नाही कि तुमचा मुलगा सर्व वेळ रडत असतो ,तसे केले असते तर माझी त्याला समजावण्याची उमेदच संपली असती .
       सहामाई चा result पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला ,त्याने सर्व विषयात A आणि B+ शेरा मिळवला होता .सर्व पालक बाहेर गेल्यावर मी टीचर ला विचारले कि हा नक्कीच त्याचा result आहे का ???कारण त्याचे 3 महिने फक्त रडण्यातच गेले होते.तिने मोठ्याने हसून मान डोलावली, आणि त्या दिवशी डोळे पुसत घरी जाण्याचा आनंद अनुभवला मी.

Sunday, July 3, 2016

चित्रपट

       लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीची काही स्वप्न असतात. अगदी छोटी छोटी, पण असतात. आपल्या भावी पतीने आपल्याला cinema ला घेऊन जावं हे तर नक्कीच वाटत असतं.
      पण मी या गोष्टीला अपवाद आहे.पत्नीबरोबर किंवा कुटुंबाबरोबर थिएटरमध्ये जाऊन अतिशय कमी चित्रपट पहिले आहेत मी. अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्या इतपत.लग्नाच्या आधी बायकोने कधी आग्रह केला तर तिला सांगायचो, "अरे काय त्या टॉकीजमध्ये जाऊन तीन तास त्या पडद्यावरील चित्र पाहत बसणार त्यापेक्षा समोरासमोर बसून भेळ खात भावी आयुष्याबद्दल बोलू , एकमेकांना समजून घेऊ. तीही असे रोमँटिक, भावनिक ऐकून खुश व्हायची. आणि लग्नानंतर आपल्याला बोलायला वेळ मिळत नाही, जो मिळतो तो असे चित्रपट बघून फुकट घालवायचा का असे बोलून तिला गप्प करायचो. पण खरे कारण हे होते की चित्रपट पाहताना मला खूप झोप यायची, बघता बघता कधी झोपून जायचो हे कळायचेच नाही. कधी कधी शेजारच्या सीट वरचा माणूस मला उठवून जायचा.
      15 वर्षांपूर्वी हे ठीक होते, त्यावेळी 5 रु तिकीट होते, आता मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन झोपणे परवडणार नाही .पण धन्य आहे माझ्या बायकोची 15 वर्षात तिने याबाबत कधीच माझ्याकडे तक्रार केली नाही. आणि कौतुक फक्त बायकोचं नाही, तर तितकच माझ्या लेकाचं पण आहे. कारण तो मित्रांकडून ऐकत असेलच काल हा picture पहिला आता हा हा radar वर आहे पण त्यानेही कधी कुरकुर केली नाही.
      उलट मी तर म्हणेन की मोकळा वेळ हा घरातल्यांनी एकमेकांसोबत गप्पा मारत घालवण्याचा, एकमेकांचे विचार जाणून घेण्याचा एक सुंदर संस्कार नकळत का होईना त्याच्यावर झाला.