Garudan
गरुडन
कॉलेज गॅदरिंगची प्रॅक्टिस संपवून तेरेसा घरी जायला निघते आणि तिच्यावर अत्याचार होऊन प्रचंड मारहाणही होते.जखमी अवस्थेत ती सलाम कॅपरीला सापडते आणि तो त्या नराधमालाही पाहतो.
तेरेसा कोमात जाते .डीसीपी हरीश माधवकडे हे प्रकरण सोपविले जाते.हरीश माधव हुशार आणि प्रामाणिक आहे. तो आरोपीला पकडतो .आरोपी आहे तिच्याच कॉलेजमधील एक प्रोफेसर निशांत कुमार.
निशांत कुमार चे डीएनए मॅच होतात आणि सलाम कॅपरीही त्याला ओळखतो. सर्व पुरावे निशांत कुमारच्या विरुद्ध असतात .आरोप सिद्ध होऊन त्याला सात वर्षाची शिक्षा होते.
सात वर्षानंतर निशांतकुमार तुरुंगातून बाहेर पडतो .त्याने तुरुंगातून कायद्याची पदवी घेतलेली असते.तो आता वकील बनला आहे. पण आता त्याला समाजात गुन्हेगार म्हणूनच पाहिले जाते.त्याची पत्नी आणि मुलगी दुरावले जातात.
डीसीपी हरीश निवृत्त होतोय.त्याला आपल्या सर्व्हिस फंडातून जे पैसे मिळणार त्यातून मुलाचे परदेशात शिक्षण करायचे आहे. तो निवृत्त होताच निशांत आपली केस पुन्हा ओपन करतो आणि स्वतःचे निरापराधित्व सिद्ध करतो आणि समाजात पुन्हा मानाचे स्थान मिळवतो इतकेच नव्हे तर तो हरिशकडून ऐंशी लाखाची नुकसानभरपाई घेण्याची कोर्टाकडून ऑर्डर काढतो. या सर्व प्रकारामुळे हरीश खचून जातो आणि अधिक चुका करतो.
निशांतच अपराधी आहे हे हरीशला माहीत आहे पण आता समाजाची सहानुभूती निशांतला आहे.एक मोठा वकील म्हणून त्याचे नाव झालेय.समाज आता हरीशला अपराधी समजतोय.
निशांतने कोणत्या योजना आखून स्वतःला निरपराधी सिद्ध केलंय आणि त्याला कोणी साथ दिलीय हे हरीशला शोधून काढायचे आहे पण आता तो एकटा पडलाय.तरीही तो स्वतःला सिद्ध करेल का ?
खरोखर निशांत अपराधी आहे की हरीशचा तपास चुकीचा होता ??