Showing posts with label पुस्तक परिक्षण. Show all posts
Showing posts with label पुस्तक परिक्षण. Show all posts

Thursday, July 30, 2026

रॉ हिटमॅन

रॉ हिटमॅन
लेखक: एस. हुसेन झैदी
अनुवाद: उल्का राऊत
प्रकाशक: मंजुल पब्लिशिंग हाऊस

सप्टेंबर २०११ मध्ये उत्तराखंडमधील नैनितालजवळील भोवालीच्या जंगलात कुप्रसिद्ध गँगस्टर राजेंद्र (राजू) परगई आणि अमित आर्य यांची निर्घृण हत्या झाली. ही हत्या भारत सरकारच्या एका गुप्त संघटनेने घडवून आणल्याची चर्चा होती. ही मोहीम पार पाडणारा एजंट 'लिमा' असल्याचे सांगितले जात होते. या घटनेने संपूर्ण उत्तराखंड हादरून गेला. राजू परगईचे अनेक प्रभावशाली राजकारण्यांशी संबंध असल्याच्याही चर्चा रंगल्या.

दुसऱ्याच दिवशी लक्ष्मण उर्फ 'लकी' बिष्ट या एनएसजी (NSG) कमांडोला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. लकीने इस्रायलमध्ये विशेष कमांडो प्रशिक्षण घेतले होते आणि अनेक धोकादायक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या होत्या. तो तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या सुरक्षा पथकातही कार्यरत होता.

राजू परगई आणि अमित आर्य यांच्या हत्येचा आरोप लकीवर ठेवण्यात आला.

खरोखरच एजंट 'लिमा' बनून लकीने या दोघांचा खून केला होता का? जर तसे असेल, तर सरकारने त्याला तब्बल पाच वर्षे तुरुंगात का ठेवले? त्याला सतत वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये का हलविण्यात आले? गुप्तचर संस्था त्याच्या बाबतीत मौन का बाळगत राहिल्या? आणि देशासाठी अनेक धोकादायक मोहिमा पार पाडणाऱ्या एका कमांडोला पोलिसांकडून इतकी अपमानास्पद वागणूक का देण्यात आली?

प्रत्यक्ष घडलेल्या घटनांवर आधारित हे पुस्तक या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधत वाचकाला शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवते.

Sunday, March 1, 2020

स्वाहा.... नारायण धारप

स्वाहा..... नारायण धारप
शहराच्या बाहेर मेन रोडवर  तो तीन मजली बंगला होता.बहुतेक वेळा तो रिकामा असायचा .कधीतरी भाड्याने दिला जायचा . त्या बंगल्याचा मूळ मालक कोण याविषयी कोणालाच माहिती नव्हती.. पण त्याचे पेपर्स क्लिअर होते.
 श्रीधरची एकुलती एक विनिता लग्न करून अमेरिकेत स्थायिक झाली . पण लग्नानंतर सात आठ वर्षांनी परत भारतात आली .तिला सहा वर्षाचा मुलगा होता.आता  तिचे मिस्टर  यशवंतराव भारतात राहूनच नवीन उद्योगधंदा सुरू करणार होते . काही महिने भारतात मुक्काम करायचा ठरविल्यामुळे त्यांनी तो बंगला भाड्याने घेतला . तीन मजली असलेला बंगला त्या तिघांसाठी सोयीचा होता . विनिता आपल्या कुटुंबासोबत  त्या बंगल्यात राहायला गेली. 
बंगला आणि आजूबाजूचा परिसर  गूढच होता. दोन मजल्यावर काही रूम्स होत्या पण तिसरा मजला थोडा चमत्कारिक होता. संपूर्ण मोकळ्या असलेल्या त्या तिसऱ्या मजल्याची ओढ वनिताला लागली. एक हवीहवीशी वाटणारी आनंदाची संवेदना तिला जाणवू लागली.
 या बंगल्यात एक फेयर लेडी आहे असे सनी तिला सांगू लागला . बंगल्याची साफसफाई केली तेव्हा बंगला नको तितका कोरा करकरीत वाटू लागला . विनिताला त्या जागेत विचित्र घडतेय याची जाणीव होऊ लागली.
त्यांचे बस्तान बसले तसा श्रीधर कामासाठी बाहेरगावी गेला.पण जेव्हा तो परत आला तेव्हा तिघेही गायब झाले होते . बंगल्याचा एजंट गायब झाला होता. 
काय घडले त्याचा शोध घेण्याचे श्रीधरने ठरविले .शोध घेताना त्याला कळले की  आतापर्यंत त्या बंगल्यातून अनेक कुटुंबे नाहीशी झाली होती.
तीन वर्षांनी  पुन्हा एक नवीन कुटुंब त्या बंगल्यात राहायला आले आहे .श्रीधरने त्या कुटुंबातील तरुणीला गाठून बंगल्याचा इतिहास सांगितला आणि त्या तरुणीला तसेच काही अनुभव आले . आता श्रीधर आणि ती तरुणी... या दोघांना मिळून बंगल्यातील दुष्ट शक्तींशी लढा द्यायचा आहे . ते यात यशस्वी होतील की पुन्हा काही बळी पडतील.
भरदिवसा अंगावर काटा आणणारी भयकथा