Wednesday, July 27, 2022

मुनिच


मुनिच
साल 1972 
मुनिक ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या इस्रायली गेस्ट हाऊसमध्ये अचानक काही लोक हातात बंदुका घेऊन घुसले . त्यांनी अकरा इस्रायली खेळाडूंना बंदी बनवून ताब्यात घेतले. स्वतःला ब्लॅक सप्टेंबर  म्हणवून घेणाऱ्या पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी ही जबाबदारी घेतली आणि त्या अकरा खेळाडूंना ठार केले .इस्रायलने या घटनेचा सूड घेण्याचे ठरविले आणि एक भयंकर योजना आकारास आली .त्या अतिरेक्यांना शोधून काढून ठार मारण्याची जबाबदारी मोसाद स्वीकारते.त्यासाठी त्यांनी एक सर्वोकृष्ट एजंट निवडला. पण आधी त्याला मोसादमधून राजीनामा घेऊन बाहेर काढले गेले. यापुढे त्यांच्याबाबतीत घडणाऱ्या कोणत्याही घटनेशी मोसाद आणि इस्रायलचा संबंध येणार नव्हता. जे अतिरेकी निवडले गेलेत त्यांना फक्त युरोपमध्येच ठार मारण्याचा हुकूम होता .
मग सुरू झाला प्रमुख गुन्हेगारांचा शोध. प्रत्येकाचा माग काढून त्याची शिकार केली गेली .अचूक प्लॅन, त्यानुसार हालचाली ,योग्यवेळी प्रसंगावधान हेच मोसादचे वैशिष्ट्य होते. 
स्टीव्हन स्पिलबर्गचे अप्रतिम दिग्दर्शन असलेला हा चित्रपट 23 डिसेंबर 2005 साली प्रदर्शित झाला आणि 1972 साली घडलेल्या मुनिक हत्याकांडाच्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या.अप्रतिम चित्रीकरण असलेला हा चित्रपट आपल्याला 72 च्या काळात घेऊन जातो.तेव्हाचे तंत्रज्ञान वापरून  गुन्हेगारांना ठार मारण्याचे कसब पाहून आपण आश्चर्यचकित होतो.
डॅनियल क्रेग ,एरीक बाना सारखी तगडी स्टारकास्ट असलेला चित्रपट एकदातरी पाहायला हवा.
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे .

Sunday, July 10, 2022

शीख.... खुशवंत सिंह


शीख.... खुशवंत सिंह
अनुवाद..प्रशांत तळणीकर
चिनार पब्लिशर्स
खुशवंत सिंह यांच्या लेखणीतून उतरलेली एक वेगळी कलाकृती .त्यांच्या नेहमीच्या वादग्रस्त लिखाणापेक्षा वेगळेच आहे . यात त्यांनी शीख धर्माचा संपूर्ण इतिहास लिहिला आहे . शिख धर्माचे संस्थापक  गुरु नानक ( १४६९ ते १५३९ ) यांच्यापासून सुरवात होते . त्यानंतर आलेल्या प्रत्येक धर्मगुरूंनी शीख धर्म कसा वाढवत नेला त्याविषयी विस्तृत माहिती त्यांनी यात दिली आहे.
ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य लढ्यात शीख धर्मियांचे मोठे योगदान आहे .त्यांचा स्वातंत्र्यलढा ,जालियनवाला बाग हत्याकांड ,स्वातंत्र्यानंतर झालेल्या दंगली आणि त्यात झालेली प्रचंड हिंसा याचे हृदयद्रावक वर्णन लेखकाने केले आहे .
गुरू ग्रंथसाहेब या पूज्यनिय पवित्र ग्रंथाचा जन्म आणि त्याचे महत्व अतिशय सुंदरपणे रेखाटले आहे.

Saturday, July 9, 2022

पावनखिंड.....रणजित देसाई

पावनखिंड.....रणजित देसाई 
मेहता पब्लिशिंग हाऊस
आतापर्यंत आपल्याला पावनखिंड म्हटली की फक्त बाजीप्रभू देशपांडे आठवतात. छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्धी जोहरच्या वेढ्यातून शिताफीने बाहेर काढून त्यांना विशाळगडावर सुखरूप पोचविण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती आणि आपल्या प्राणांची आहुती देऊन त्यांनी ती पार पाडली.
पण  बाजीप्रभू देशपांडे कोण आहेत ?? त्यांचा परिवार ,त्यांची हुशारी, त्यांची दूरदृष्टी या पुस्तकात लेखकाने सांगितली आहे .
बाजीप्रभू  हे बादलांचे सचिव .महाराजांनी खलिता पाठवून बांदलाना स्वराज्यात सामील होण्याची विनंती केली.पण त्यांनी ती नाकारली . नाईलाजाने महाराजांनी रोहिडा किल्ल्यावर हल्ला केला आणि बाजींचे मन जिकले त्यांना स्वराज्याचे महत्व सांगितले. तेव्हापासून बाजीप्रभू देशपांडे महाराजांचे भक्त झाले.
बाजींच्या मार्गदर्शनाखाली जासलोक गडाची दुरुस्ती केली गेली. अफझलखानाच्या मोहिमेत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली . त्यांना माणसांची चांगली पारख होती. कोणत्या जागी कोणता माणूस उपयोगी पडेल याची त्यांना जाण होती.
भीमा झुनके मावळा लंगडा होता पण झाड तोंडणीत कोणीही त्याचा हात धरू शकत नव्हता. अफझलखानच्या स्वारीत त्यांनी इतकी बेमालूनपणे झाडे कापली होती की लहान मुलांच्या धक्क्याने ही ती पडतील आणि रस्ते बंद होतील.
 सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला तेव्हा  बाजीप्रभू देशपांड्यांनी  महाराजांना पन्हाळ्यावरून  विशाळगडावर पोचविण्याची जबाबदारी घेतली .रात्रीच्या अंधारात भर पावसात त्यांनी महाराजांना गडाबाहेर काढून विशाळगडाकडे कूच केले पण शत्रूला त्याचा सुगावा लागताच पाठलाग सुरू झाला .विशाळगड काही अंतरावर असतानाच शत्रू जवळ आला आणि त्यांना घोडखिंडीत अडविण्याची जबाबदारी बाजींनी आपल्या खांद्यावर घेतली. बाजींनी आपल्या बांदल सेनेसह सिद्धी जोहरच्या सेनेला घोडखिंडीत अडवून धरले. महाराज गडावर पोचेपर्यंत ते लढत राहिले .शेवटी तोफेचा आवाज ऐकून त्यानी प्राण सोडले.त्यांच्या पराक्रमाला वंदन करून घोडखिंडीचे नाव पावनखिंड करण्यात आले .
लेखकाने अतिशय बारकाईने आणि अचूकतेने बाजीप्रभूंचे चरित्र लिहिले आहे . महाराजांच्या निष्ठावान शिलेदाराची ही कादंबरी वाचायलाच हवी.