अलक ....१३
सगळे त्याला शिव्या द्यायचे. काहीजण खविस म्हणायचे तर काही हिटलर. तो तसाच होता. शहरातील कोणताही विभाग त्याच्या हाती दिला की तो कठोरपणे कायदा राबवायचा. आताही तो ज्या विभागाचा प्रमुख होता तेथे अतिशय कडकपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी केली होती.रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता की फेरीवाला. तो सापडेल त्याला क्रूरपणे फटावले जात होते. शेवटी काही लोकांचा उद्रेक झालाच . बारा दिवसानंतर त्याच्यावर भयानक जीवघेणा हल्ला झाला . पण त्यामुळे लॉकडाऊन अजून कडक झाले . पण जेव्हा तो डिस्चार्ज होऊन बाहेर पडला तेव्हा विभागातील कोरोनाग्रस्त पेशंटची संख्या जवळजवळ संपली होती .
© श्री .किरण कृष्णा बोरकर
No comments:
Post a Comment