Sunday, November 13, 2016

विरोध

केवळ विरोधी पक्ष आहे म्हणून सरकारच्या प्रत्येक निर्णयावर विरोध करायचा का ?? आज सरकारने भ्रष्टचार आणि काळा पैश्याच्या विरोधात एक पाऊल पुढे टाकले आहे . त्याचा थोडाफार त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतोय पण त्यांनी हा त्रास आनंदाने स्वीकारला आहे . पण ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांच्या पोटात फार दुखू लागले आहे . आज विरोधक सर्वसामान्य जनतेला किती त्रास होतोय ते सांगतायत पण त्यांना इतर त्रास वर्षानुवर्षे होतोय त्याकडे लक्ष देत नाहीत . पाण्याची समस्या,रस्त्यावरील खड्डे,शेतकऱ्यांच्या आत्महत्या याकडे लक्ष न देता अशा गोष्टीवर बोंब मारतायत . सरकारने संपूर्ण चलन तर बाद केले नाही . घर चालविण्यासाठी आणि इतर आवश्यक गोष्टीसाठी 500/ 1000 च्या नोटा काही दिवस वापरायची परवानगी सरकारने दिली आहेच .  या आधीच्या पंतप्रधानांनी काही धाडसी निर्णय घेतले होते आणि विरोधकांनी त्यांनाही विरोध केला होता . इंदिरा गांधींनी सुवर्ण मंदिरात सैनिकी कारवाई केली होती आणि त्यावेळी राष्ट्रपतीहि शीख होते तर त्या कारवाईचे प्रमुख हि शीख होते पण त्यानंतर खलिस्तान चळवळ पूर्णपणे थंडावली होती ,राजीव गांधींनी श्रीलंकेत शांतिसेना पाठवून तामिळ बंडखोरावर अंकुश आणला त्यालाही विरोध केलाच पण त्यानंतर LTTE चा जोर कमी झाला .पण त्याचा परिणाम आपल्या पंतप्रधानांच्या हत्येत झाला . वैयक्तिक स्वरूपात आपल्या पंतप्रधानांचे  खूप नुकसान झाले . पण देशावरचे दहशतवादाचे संकट टळले. आज सरकार बहुमताने निवडुंन आले आहे आणि त्यांनी जे निर्णय घेतले त्याचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले आहे .आपण या गोष्टीसाठीच त्यांना निवडून दिले आहे मग त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिलाच पाहिजे. नुसती चर्चा आणि फक्त चर्चा करण्यापेक्षा काहीतरी कृती केली ते महावाचे आहे असे वाटत नाही का ?  उद्या त्याचे परिणाम काय होतील याचा विचार न करता आज त्या कृतीमुळे काय घडले ते पाहूया .  आज या संपूर्ण प्रक्रियेत बँक कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे ,ते हि दिवसरात्र जनतेची सेवा करतायत. काल रात्री 11 वाजेपर्यंत माझा एक मित्र बँकेत काम करीत होता ,तर पुण्यातील माझी मैत्रीण मेधा नाईक तिचा अपुरा स्टाफ सोबतीला घेऊन दिवसभर जनतेला पैसे बदलण्यासाठी ,खात्यात पैसे भरण्यासाठी हसतमुख चेहऱ्याने मदत करतेय . आपण त्यांचे अभिनंदन केले पाहिजे त्यांच्या कामाची कदर केली पाहिजे. आणि देशहितासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे.

No comments:

Post a Comment