Thursday, December 1, 2016

मनीचे लग्न

बंड्याच्या घरातून भांडी पडायचे आवाज येऊ लागले तसा मी सावरून बसलो. कारण वादाला सुरवात झाली होती आणि थोड्यावेळाने मला आमंत्रण येणार होते . हा जुना अनुभव होता माझा .त्याच्या आईला काही सुचले नाही कि भांडी खाली पडतात . मी तयारीतच  बसलो. अपेक्षेप्रमाणे वहिनी आल्याच " भाऊ ,चला ,आवरा त्या दोघांना ". मी निमूटपणे निघालो.
घरात शिरताच बंड्या म्हणाला " भाऊ बाबाना समजावा ,ह्या नोटबंदीच्या काळात ते मनीचे लग्न कसे होईल याची काळजी करतायत ." मनी उर्फ मनीषा कोपर्यात गरीब गाईसारखी अंग चोरून बसली होती . अतिशय शांत मुलगी ,कधीच स्वतःची मत व्यक्त करत नव्हती . बाबा आणि भाऊ म्हणतील ते मुकाट ऐकत होती . " आहो एकुलती एक मुलगी ,मग लग्न थाटामाटात नको का करायला ,सगळे नातेवाईक ,मित्रपरिवार येणार त्यांचे आदरातिथ्य नको का करायला ?". बाबा म्हणाले तसा बंड्या परत उसळला "आदरतिथ्यची नक्की व्याख्या काय आहे तुमची? ,त्यांना पोटभर खाऊ पिऊ घातले आणि फोटो काढले म्हणजे झाले का ?? मी तर म्हणतो पत्रिकेवर सरळ मनीचा बँक अकाउंट नंबर आणि IFSC  कोड छापा ,भांडी आणि भेटवस्तू नको असे सांगा ,त्यामुळे स्टेजवर येणाऱ्यांची गर्दी कमी होईल . सगळं आहेर मनीच्या अकाउंट मध्ये जमा होईल . त्यांची भविष्याची सोय होईल ,तो पैसे त्यांना त्यांच्या संसारासाठी वापरता येईल ,आणि सगळा पांढरा पैसा ,काळ्या पैशाचा प्रश्नच येत नाही . देणार्यांनाही प्रॉब्लेम नाही ,सगळ्यांना पुरावे मिळतील .  राहिला फोटो काढायचा आणि स्टेज वर गर्दी करायचा प्रश्न तर नवरा बायकोला खाली पाहुण्यात फिरू द्या ,ते तुम्हाला भेटण्यापेक्षा तुम्ही त्यांना भेटा ,तेव्हाच त्यांचे फोटो काढा ,म्हणजे पाहुणे खुश होतील . आणि हो जेवणात पंधरा वेगवेगळे पदार्थ ठेवण्यापेक्षा मोजकेच पदार्थ ठेवा म्हणजे जेवणही फुकट जाणार नाही . लोकांकडे निवडीचा पर्याय राहणार नाही ,दोन काउंटर जास्त ठेवू त्यामुळे गर्दी हि होणार नाही .  उलट येणाऱ्या नव वधूवराना  पाहुणे प्रेमाने भरवतील त्यातत त्यांचे पोट भरेल आणि शेवटी नवराबायकोचे संग्रसंगीत जेवण असते तेही वाचेल शिवाय  वेटरला जी सेवा न करण्याची भरमसाठ बक्षिसी द्यावी लागते ती हि वाचेल . "अरे बापरे ,बंड्याचे हे क्रांतिकारी विचार ऐकून मी हड्बडलोच. मग बाबाना किती धक्का बसला असेल ??  कुठेतरी मनातून हे पटत हि होते पण भारतीय संस्कृती आणि समाजाशी द्रोह हा विचार मनात शिरू देत नव्हता .  माझ्या गप्प बसण्याचा बंड्याने त्याला पाहिजे तसा अर्थ घेतला आणि जोरात बाबाना म्हणाला " बघा बघा ,भाऊंना हि पटतंय . बाबानी हताश होऊन माझ्याकडे पहिले . मी नजरेनेच त्यांना धीर दिला . म्हटले ," बंड्या परिस्थिती अजून इतकीही वाईट आली नाही ,लग्नाला अजून खूप दिवस आहेत आणि समोरच्या मंडळींचा हि विचार करायला नको का ? त्यांना हि विचार करायला वेळ दे"  शेवटी लग्न हे दोन्ही बाजूच्या संमतीने झाले पाहिजे . कदाचित तुझ्या काही गोष्टी पटतील त्यांना तसेच त्यांच्याही काही गोष्टी तुम्ही मान्य केल्या पाहिजेत . का उगाच आतापासूनच भांडायला सुरवात करतायत . तू संध्याकाळी घरी ये आपण नीट चर्चा करू " असे बोलून विषय संपवला आणि संध्याकाळच्या चर्चेची मनात तयारी करत घरी परतलो.

No comments:

Post a Comment