धागे....गुलजार
संपादन....अनंत दीक्षित
मेहता पब्लिकेशन
सकाळ वृत्तपत्रासाठी गुलजार यांनी वर्षभर स्तंभ लेखन केले.अनंत दीक्षित यांनी त्याचे संपादन केले .
हे आठवणींचे धागे आहेत . एक संवेदनशील कलाकार आपल्या जीवनातील आठवणींचे धागे कसे विणतो .हे वाचण्यासारखे आहे.
कधी सरळ ...तर गुंतागुंतीचे .....आपले मन ..विचार ,इतरांबद्दलच्या भावना गुलजार यांनी मोकळेपणाने व्यक्त केल्यात .
त्या मुलांची आठवण ठेवा मध्ये त्यांनी 26 जानेवारीला गुजरातमध्ये झालेल्या भूकंपाचे भीषण चित्र उभे केले आहे . नैसर्गिक आपत्ती आणि त्यांना होणाऱ्या मदतीवर त्यांच्या पुनर्वसनावर विचार मांडले आहेत.
कवितेची रुजवात मध्ये कविता कशी जन्माला येते याची सहज सोप्या पद्धतीत माहिती दिली आहे .
स्वतःला कसे शोधतो ते आत्मशोधाच्या वाटेवर सांगितले आहे .
गालिब आणि इतर शायर ,कुसुमाग्रज ,पु. ल. बद्दल त्यांनी दाखविलेला आदर पाहून आपण थक्क होतो . माणूस दुसऱ्यांचा आदर करतो तेव्हाच तो एका उंचीवर जातो हे त्यांनी आपल्या सहवासात आलेल्या व्यक्तींबद्दल लिहून सिद्ध केले आहे .
भ्रष्टाचाराविषयी ते पोटतिडकीने लिहितात . दहशतवादी शेतातून उगवत नाही तर ते आपणच निर्माण करतो .
पावसाची विविध रूपे त्यांच्याकडूनच ऐकवीत . ते लिहितात पावसाची आगेकूच एखाद्या लष्करासारखी होते . ते इशारा देतात.. त्या काळात पक्षीही आपले घरटे सुरक्षित ठेवतात. शेतकरी शेतीची कामे सुरू करतो. ते पावसाला विविध उपमा देतात .कधी झाड तर डोंगरावरून वेगळ्या प्रवाहात वाहणारे दोन मित्र . पावसाची रूपे ही विविध आहेत . एक पाऊस चौकशी करायला येतो . परिस्थितीची पाहणी करून जातो .तर एक पाऊस रागावलेला असतो तो कोणाचा मुलाहिजा ठेवत नाही .
खरेच हे गुंतलेले आठवणींचे धागे आपण वाचून सोडवायला हवे .
No comments:
Post a Comment