Friday, May 1, 2020

धागे ... गुलजार

धागे....गुलजार 
संपादन....अनंत दीक्षित 
मेहता पब्लिकेशन 
सकाळ वृत्तपत्रासाठी गुलजार यांनी वर्षभर  स्तंभ लेखन केले.अनंत दीक्षित यांनी त्याचे संपादन केले .
हे आठवणींचे धागे आहेत . एक संवेदनशील कलाकार आपल्या जीवनातील  आठवणींचे धागे कसे विणतो .हे वाचण्यासारखे आहे.
कधी सरळ ...तर गुंतागुंतीचे .....आपले मन ..विचार ,इतरांबद्दलच्या भावना गुलजार यांनी मोकळेपणाने व्यक्त केल्यात .
 त्या मुलांची आठवण ठेवा मध्ये त्यांनी 26 जानेवारीला गुजरातमध्ये झालेल्या भूकंपाचे भीषण चित्र उभे केले आहे . नैसर्गिक आपत्ती आणि त्यांना होणाऱ्या मदतीवर  त्यांच्या पुनर्वसनावर विचार मांडले आहेत.
 कवितेची रुजवात मध्ये कविता कशी जन्माला येते याची सहज सोप्या पद्धतीत माहिती दिली आहे .
 स्वतःला कसे शोधतो ते आत्मशोधाच्या वाटेवर  सांगितले आहे .
गालिब आणि इतर शायर ,कुसुमाग्रज ,पु. ल. बद्दल त्यांनी दाखविलेला आदर पाहून आपण थक्क होतो . माणूस दुसऱ्यांचा आदर करतो तेव्हाच तो एका उंचीवर जातो हे त्यांनी आपल्या सहवासात आलेल्या व्यक्तींबद्दल लिहून सिद्ध केले आहे .
भ्रष्टाचाराविषयी ते पोटतिडकीने लिहितात . दहशतवादी शेतातून उगवत नाही तर ते आपणच निर्माण करतो .
पावसाची विविध रूपे त्यांच्याकडूनच ऐकवीत .  ते लिहितात पावसाची आगेकूच एखाद्या लष्करासारखी होते . ते इशारा देतात.. त्या काळात पक्षीही आपले घरटे सुरक्षित ठेवतात. शेतकरी शेतीची कामे सुरू करतो. ते पावसाला विविध उपमा देतात .कधी झाड  तर डोंगरावरून वेगळ्या प्रवाहात वाहणारे दोन मित्र . पावसाची रूपे ही विविध आहेत . एक पाऊस चौकशी करायला येतो . परिस्थितीची पाहणी करून जातो .तर एक पाऊस रागावलेला असतो तो कोणाचा मुलाहिजा ठेवत नाही .
खरेच हे गुंतलेले आठवणींचे धागे आपण  वाचून सोडवायला हवे .

No comments:

Post a Comment