Tuesday, April 26, 2022

कौसल्या.... जयवंत दळवी

कौसल्या.... जयवंत दळवी 
नवचैतन्य प्रकाशन 
स्त्री पुरुष संबंध मांडण्यात दळवीचा हातखंडा आहे.मानवी मनाचे कंगोरे ते हळुवारपणे उलगडत जातात.कधीकधी ते किळसवाणे असतात तर कधी भावनिक.त्यांचे पात्रे नेहमीच मनाचा आतील भाग उघड करतात.
दळवींच्या कथेत वासनेला एक विशिष्ट स्थान आहे.लैंगिक जीवनाचे विविध अविष्कार पाहणे,त्याचे निरीक्षण करणे,परीक्षण करणे आणि ते साहित्यातून मांडणे याचे त्यांना वेडच आहे.
कादंबरीत मंजुनाथ हा प्रसिद्ध नट आहे. तर मनू दीक्षित हा त्याचा जिवलग मित्र .मनू नाटककार आहे. मंजुनाथच्या जीवनात अनेक स्त्रिया आल्या. त्यातीलच  एक कौशल्या .ती मंजुनाथपेक्षा बारा वर्षांनी लहान .. प्रेमात पडून ती मंजुनाथच्या घरी आली आणि मंजुनाथची पहिली पत्नी उर्मिला गायब झाली.
दळवींच्या या कथेत त्यांची पात्रे गरजेनुसार प्रवेश करतात. तोपर्यंत आपल्याला त्यांच्याविषयी काहीच माहिती नसते. मंजुनाथच्या आयुष्यात कौसल्यानंतरही दुसरी स्त्री येतेच .मंजुनाथने आपल्या भावाच्या पत्नीलाही सोडले नव्हते.मंजुनाथच्या वडिलांनाही स्त्रियांचे आकर्षण .ते कोणत्यातरी वृद्धाश्रमात राहातायत  पण तिथेही त्यांची लफडी सुरूच आहेत.
या सर्व प्रवासाचा मनू दीक्षित साक्षीदार आहे.तो सूत्रधार बनून आपल्याला सर्व सांगतो. तो मंजुनाथच्या जीवनावर कथा लिहितोय.पुढे काय होते....?? ते कळायला कौसल्या वाचायला हवी.

No comments:

Post a Comment