Monday, November 21, 2022

पाटलीपुत्राचे राजपुत्र

पाटलीपुत्राचे राजपुत्र 
चाणक्य- चंद्रगुप्त-अशोक - त्रिधारा कादंबरी १
श्रेयस भावे 
अनुवाद..डॉ. वैशाली जुंदरे
राजहंस प्रकाशन 
संपूर्ण भारतावर एकछत्री अंमल असावा .हे आर्य चाणक्यचे स्वप्न चंद्रगुप्ताने पूर्ण केले .त्यानंतर त्याचा पुत्र बिंदुसारने हे साम्राज्य पुढे वाढविले.पण आता बिंदुसार मृत्यूशय्येवर आहे. त्याचे शंभर राजपुत्र वेगवेगळ्या राज्यात पसरले आहेत. बिंदुसारचा जेष्ठ पुत्र सुमेष आता राज्याची धुरा सांभाळतोय.पण तो सम्राट नाही . त्यासाठी त्याने अश्वमेध यज्ञ सुरू केला.
बिंदुसारला आपल्या आई आणि पित्याच्या मृत्यूचे कारण कळले आणि त्याने आर्य चाणक्यना  राज्याबाहेर हाकलवून दिले.आर्य चाणक्य आता कौटिल्य नावाने शहराबाहेर एक वेश्यालय चालवितात.खरे तर हा व्यवसाय म्हणजे त्यांचा एक बुरखा आहे. ते आजही तक्षशिलावर बारीक नजर ठेवून आहेत.ते आपल्या गुप्तचरांमार्फत अनेक मोहिमा घडवून आणतात. तक्षशिलाचा महामंत्री राधागुप्त त्यांचाच माणूस आहे .
अशोक हा बिंदुसारचा नावडता पुत्र. त्याची आई वैश्य म्हणून त्याचा राग करतात. त्याचे आयुष्य फक्त लढाया करण्यात  गेलंय. आताही त्याला अवंती नगरीतील बंड मोडायला जायचंय. सर्व सैन्य त्याच्या मर्जीवर चालतेय म्हणून बिंदुसार त्याला परवानगी देत नाही पण राजकुमार सुमेष त्याला परवानगी देतो.
ही कथा दोन कालावधीत घडतेय . दोन्ही घटनांमध्ये कालावधी साधारण पन्नास वर्षाचा आहे. 
पन्नास वर्षांपूर्वी 
ग्रीक सम्राट अलेक्झांडरने भारतात प्रवेश करून अनेक राज्य जिंकली. पण  पौरव राज्याचा  राजा पौरसने त्याला आव्हान दिले.पौरसला मदत कर हे सांगण्यासाठी चाणक्य  तक्षशिलेचे महाराज आंभीकडे जातात पण आंभी त्याला नकार देतो आणि अलेक्झांडरला मदत करतो.मग चाणक्य  नंद घराण्यातील धनानंदांकडेकडे जातो. पण तिथेही त्याला चोर म्हणून तुरुंगात टाकले जाते. कृतीदलाचे सभासद त्याला तुरुंगातून सोडवितात . पुढे तो चंद्रगुप्ताला सम्राट बनवितो.
त्यानंतर पन्नास वर्षांनी आज चाणक्यला सम्राट बिंदुसारनंतर अशोकला सम्राट बनवायचे आहे आणि तो पुन्हा आपली  चाणक्यनीती वापरून अशोकला सम्राट बनवेल का ?? त्यासाठी तो काय काय खेळी करतो ? अश्या अनेक रहस्याची  उकल सोडविण्यासाठी हे  पुस्तक वाचावे लागेल.

No comments:

Post a Comment