Friday, December 2, 2022

कथा परमवीरचक्र विजेत्यांच्या आणि ऑपरेशन सदभावना

कथा परमवीरचक्र विजेत्यांच्या आणि ऑपरेशन  सदभावना
अनुराधा विष्णू गोरे
ग्रंथाली प्रकाशन 
सैन्यदलात सर्वोच्च पुरस्कार म्हणून परमवीर चक्र ओळखले जाते.आपल्या जीवाची बाजी लावून युद्धात अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या सैनिकाला परमवीरचक्र पुरस्काराने गौरविले जाते.
1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि  त्यानंतर 1947 ते 1999 या कालावधीत झालेल्या युद्धात केवळ एकवीसजणांना परमवीरचक्राचा बहुमान मिळाला.
1947 साली भारत पाक युद्धात मेजर सोमनाथ शर्मा हे पहिले परमवीरचक्र मानकरी ठरले त्यानंतर झालेले भारत चीन युद्ध , कांगोमधील शांतिसेनेत कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया तर 1999 कारगील युद्धात परमवीरचक्र मिळविणाऱ्या सर्व वीरांच्या कहाण्या आहेत.
युद्धात दाखविलेली त्याची अतुलनीय आणि अचाट कामगिरी वाचून आपल्याला भारतीय सैन्यदलाचा अभिमान वाटतो.
ऑपरेशन सद् भावना 
भारतीय सैन्यदल युद्धात जितके क्रूर आणि कठोर आहेत तितकेच ते शांतीप्रिय आणि मानवतावादी हळवेही आहेत.त्यांचे हे रूप ऑपरेशन सद् भावना मोहिमेत दिसून येते.जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात आणि ईशान्य भारतात सैन्यदलाने स्थानिकांचा विश्वास संपादन करून अनेक योजना राबवील्या .त्यासाठी त्यांनी सामान्य जनतेचे सहाय्य घेतले.शाळा कॉलेज ,वैद्यकीय सेवा सुरक्षितपणे सुरू केल्या.भारतातील इतर राज्यांच्या संस्कृतीची ओळख करून दिली.तिथल्या तरुण विद्यार्थ्यांना भारताची सफर घडवून दिली. जसजसे ऑपरेशन सद् भावना यशस्वी होत गेले तसंतसे सैन्यदलाने आपला सहभाग कमी करून ते जनतेला अर्पण केले.ऑपरेशन सद् भावनामध्ये सामान्य नागरिकही कसे सहभागी होऊ शकतात याची माहिती यात दिली आहे .
प्रत्येक भारतीयांना आपल्या सैन्यदलाचा अभिमान वाटेल असे हे पुस्तक आहे 

No comments:

Post a Comment