Wednesday, December 14, 2022

तक्षशिला-पाटलीपुत्र- झंझावात

तक्षशिला-पाटलीपुत्र- झंझावात
चाणक्य-चंद्रगुप्त-अशोक- त्रिधारा  कादंबरी -दोन
श्रेयस भावे
अनुवाद..अनघा नाटेकर
राजहंस प्रकाशन 
सम्राट बिंदुसार आता वृद्ध झालाय .त्यानंतर त्याचा थोरला मुलगा सुमेष सम्राट होईल असेच सर्वजण समजून चालतायत.पण आर्य चाणक्याना ते मंजूर नाही. चंद्रगुप्ताला हाताशी धरून त्याने हे साम्राज्य उभे केलेय.पण आपल्या आईच्या हत्येला कारणीभूत ठरवून बिंदुसारने चाणक्यला हद्दपार केले होते.पण चाणक्यने कधीही हार मानली नाही. चिरंतन वैदिक कृतीदलाची साथ घेऊन त्याने शहराबाहेर वेश्यालय सुरू केलंय आणि आपल्या हेरांचे जाळे सगळ्या राज्यात पसरविले आहे. 
राजपुत्र सुमेष अर्ध यवन आहे .म्हणजे त्याची आई ग्रीक होती . म्हणूनच तो सम्राट होणे चाणक्यला मान्य नाही .मग दुसरा उत्तराधिकारी कोण असेल ?? अशोक बिंदुसारचा ९८ वा पुत्र. त्याची आई वैश्य आहे आणि तो बिंदुसारचा नावडता पुत्र.लहानपणापासूनच त्याला सैनिकांसोबत वाढविले गेले .त्याने सतत लढाया केल्या.त्यामुळेच तो क्रूर आहे.
राजपुत्र सुमेषचे इतर भाऊ दारू आणि स्त्रियांत मग्न आहेत.त्यांना फक्त ऐशआराम हवाय. चाणक्यने सम्राटपदासाठी अशोकची निवड करून  त्याप्रमाणे योजना तयार केली.त्याने बिंदुसारच्या पुत्रांना एकत्र पाटलीपुत्रात जमा केले आणि त्या सर्वांची अशोकाकरवी हत्या केली.त्याआधी त्याने एक षडयंत्र आखून अशोककडूनच राजपुत्र सुमेषच्या अश्वमेध घोड्याची हत्या केली होती आणि सुमेषच्या मनात अशोकाविषयी द्वेष निर्माण केला.
आता अशोक पाटलीपुत्रच्या सिंहासनावर बसून सुमेषची वाट पाहतोय.त्याच्यासोबत त्याची प्रेयसी देवी आहे.देवी हुशार आहे .ती उत्तम वैद्य आणि उत्कृष्ट नर्तिका आहे .पण ती शूद्र आहे.आणि एक शूद्र स्त्री सम्राटाची पत्नी होणे चाणक्यला मान्य नाही .योग्य वेळ येताच तो तिलाही अशोकपासून दूर करेल .
पाटलीपुत्र बाहेरून जिंकणे कोणालाही शक्य नाही ते आतूनच जिंकता येईल.हेच सूत्र चाणक्य आणि चंद्रगुप्ताने पन्नास वर्षांपूर्वी वापरून पाटलीपुत्र जिंकले होते.पाटलीपुत्रात जमिनीखाली असंख्य भुयारांचे जाळे आहे .त्यांचा योग्य मार्ग चाणक्यशिवाय कोणालाही माहीत नाही.चिरंतन वैदिक कृतीदलाचे सदस्य या भुयारांचे रक्षण करतायत .
सर्व काही आचार्य चाणक्यच्या योजनेनुसार घडेल का ??
अशोक चाणक्यच्या सल्ल्यानुसार राज्यकारभार करेल ?
प्रचंड सैन्य घेऊन स्वारी करायला निघालेल्या सुमेषचा पराभव अशोक कसा करेल ??
चाणक्य-चंद्रगुप्त-अशोक त्रिधारातील ही दुसरी कादंबरी 
 

No comments:

Post a Comment