Thursday, February 9, 2023

वध

वध
संभूनाथ मिश्रा आणि मंजू मिश्रा हे वृद्ध दांपत्य ग्वालियर येथे आपल्या छोट्या घरात राहतात.त्यांची आर्थिक स्थिती ओढाताणीची आहे. आपल्या तुटपुंज्या पेन्शन आणि लहान मुलांच्या ट्युशनवर त्यांची उपजीविका चालते.त्यांचा मुलगा शिक्षणासाठी परदेशात गेलाय आणि तिथेच नोकरी लग्न करून स्थायिक झालाय.आता त्याला आईवडिलांशी बोलायला वेळ नाही. तो त्यांना पुरेसे पैसे ही पाठवत नाही.
मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठविताना मिश्रा कर्जबाजारी झालाय.त्याने राहते घरही सावकाराकडे गहाण टाकलंय आणि दर महिन्याला त्याचे हप्ते प्रजापती पांडे या गुंडाकडे देतोय.
पांडे दर महिन्याला त्याच्याकडे एक मुलगी घेऊन येतो.त्यांच्याकडे बसून दारू पितो चिकन खातो.आणि त्यांच्याच बेडरूमचा वापर करतो. मिश्रा हे नाईलाजाने सहन करतोय.
एक दिवस पांडे त्याच्याकडे येऊन घर खाली करायला सांगतो .मिश्रा त्याच्यासमोर हात जोडतो पण तो ऐकत नाही .तो मिश्राला मारहाण करतो.शेवटी तो मिश्राकडे त्याच्याकडे ट्युशनला येणाऱ्या नयना नावाच्या मुलीची मागणी करतो.नयना फक्त बारा वर्षांची आहे .ते ऐकून मिश्रा चिडतो आणि पांडेचा खून करतो.
मंजू पांडेंचे शव पाहून हादरते. मिश्रा त्या प्रेताचे तुकडे करून जाळून टाकतो .मिश्राच्या हातून खून झालाय हे मंजू सहन करू शकत नाही. पोलिस  आणि पांडेची पत्नी मिश्राकडे चौकशी करते पण मिश्रा त्यांना काही सांगत नाही .पांडेंची सहा वर्षाची मुलगी आहे आणि पांडेंचे तिच्यावर खूप प्रेम आहे असे ही सांगते.
शेवटी मंजुच्या प्रेमाखातर मिश्रा पोलीस स्टेशनला जाऊन गुन्ह्याची कबुली देतो पण हवालदार ते हसण्यावारी नेतो आणि त्याला घरी पाठवतो . घरी आल्यावर मिश्रा मंजुला पांडेला मारण्याचे कारण सांगते तेव्हा मंजू त्याने योग्य केले हे कबूल करते आणि मिश्राचे दडपण दूर होते.
इथे तो हवालदार आपल्या साहेबाला शक्ती सिंहला मिश्राचा कबुलीजबाब सांगतो. शक्ती सिंह मिश्राला याबद्दल विचारतो तेव्हा मिश्रा सर्व काही नाकारतो .शक्ती सिंह फक्त पांडेच्या मोबाईलची मागणी करतो पण मिश्रा नाकारतो .
इकडे पांडेचा मालक मिश्राला दोन दिवसात घर खाली करायला सांगतो.तर मोबाईलच्या बदल्यात पांडेचा खून माफ करण्याचे वचन शक्तीसिंह मिश्राला देतो.
शेवटी मिश्रा पांडेचा मोबाईल शोधून काढतो आणि काही धक्कादायक गोष्टी त्याला दिसतात.तो मोबाईल शक्तीसिंहच्या स्वाधीन करतो. शेवटी काय होते ???मिश्रा आपले घर वाचवू शकतो का ??
शंभूनाथ मिश्राच्या भूमिकेत संजय मिश्रा चपखलपणे बसलाय.जणूकाही त्यासाठीच मिश्रा बनलाय असे वाटते.आर्थिक आणि मानसिक दुर्बलता त्याच्या चेहऱ्यावर संपूर्ण चित्रपटभर जाणवते.तर मंजू मिश्राच्या भूमिकेचे नीना गुप्ता त्याच्यासमोर ताकदीने उभी राहते.तिचे गुढग्याचे आजारपण ,मुलांसमोर विडिओ कॉलवर आगतिकपणे बोलणे .पांडेंचे प्रेत आणि मिश्राचा अवतार पाहून हादरणे अतिशय प्रभावीपणे उभे केले.बाकीच्या पात्रांना फारसा वाव नाहीय.
एक तास पन्नास मिनिटांचा हा चित्रपट आपल्याला अस्वस्थ करतो आपली इच्छा असूनही आपल्याला जागेवरून उठू देत नाही .
चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे .

No comments:

Post a Comment