UGLY
अग्लि
शालिनीचे डिसीपी शौनक बोसशी दुसरे लग्न आहे. तिला पहिला पती राहुलपासून कली नावाची दहा वर्षाची मुलगी आहे.राहुल फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिरो बनण्यासाठी स्ट्रगल करतोय. कास्टिंग डायरेक्टर चैत्यन्य त्याचा खास मित्र आहे.शालिनी डिप्रेशनमध्ये असते.घरी सतत टीव्ही पाहणे, दारू पिणे हेच काम करतेय .राहुल कधीकधी कलीला घेऊन बाहेर फिरायला जातो.
त्या दिवशी ही तो कलीला घेऊन बाहेर गेला. चैत्यन्यच्या घरी त्याची एक ऑडिशन होती म्हणून तो कलीला गाडीत बसवून त्याच्या घरी गेला.चैत्यन्य बाहेर होता पण घरी येताच त्याने सांगितले कली गाडीत नाही आणि दरवाजाही उघडा आहे.दोघेही बाहेर तिला शोधायला धावतात .चैत्यन्यला एका फाटक्या माणसाकडे कलीचा फोन सापडतो .ते त्याच्या मागे लागतात पण पळता पळता तो अपघातात मरण पावतो.
आता सुरू होते राहुल आणि चैत्यन्यची चौकशी. इथे शौनक बोस प्रत्येकावर संशय घेतो .तो शालिनीचे फोन ही टॅप करतोय. कलीच्या सुटकेसाठी परदेशातून खंडणी मागितली जाते.
पण कली कुठेय ? खरोखरच तिचे पैश्यासाठी अपहरण झालेय की तिची परदेशात विक्री झालीय .
अनुराग कश्यपचा माणसाच्या स्वार्थी वृत्तीवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट हादरवून सोडतो .
तेजस्विनी कोल्हापूरे ,रोहित रॉय, राहुल भट असे उत्तम कलाकार यात आहेत.पण गिरीश कुलकर्णीचा विशेष उल्लेख करावा लागेल.यात बरेचसे मराठी कलाकार आहेत.
No comments:
Post a Comment