Sunday, October 9, 2016

तो

तो कंजूरमार्गाला माझ्या डब्यात शिरायचा आणि त्याची ती विशिष्ट टाळी ऐकून माझी पुस्तकात खुपसलेली मान वर जायची .जणु तो आपल्या आगमनाची वर्दी द्यायचा .मग प्रत्येकाकडे टाळी वाजवत आणि टोमणे मारत फिरायचा .जो पैसे देत नाही त्याच्यापाशी जास्तवेळ घोटाळायचा त्याला लाडीगोडी लावायचा ,स्पर्श करायचा ,जो देईल त्याला आशीर्वाद म्हणून डोक्यावर हाथ ठेवून जायचा .
माझ्याकडे येऊन टाळी वाजवली कि मी वर  पाहायचो आणि मानेनेच नाही बोलायचो ,मग तो निमूटपणे मागे फिरायचा .एकही शब्द ना बोलता .गेले वर्ष दीड वर्ष  हेच चालू होते ,पण त्याने किंवा मी तोंडातून एकही शब्द बाहेर काढला नाही.
पण त्यादिवशी कुटुंबाला घेऊन डोंबिवलीला जायचे होते .नंतर गर्दी होते म्हणून नेहमीचीच लोकल पकडली . कांजूरमार्गला त्याने डब्यात एन्ट्री केली .त्याला पाहताच बायको कानात कुजबुजली "आहो,द्या त्याला काहीतरी ,आशीर्वाद चांगले असतात त्यांचे ". मी हसून खिश्यात हाथ घातला आणि पाच रुपयाचे नाणे हातात ठेवले .नेहमीप्रमाणे तो आला पण यावेळी माझ्याकडे बघून तो काही न करता परत मागे फिरला आणि दुसरीकडे जाऊन हाथ पसरला .बायकोने माझ्याकडे डोळे वटारून पाहिले. त्यानंतर दोन दिवस सुट्टी असल्याने माझे जाणे झालेच नाही .आता उद्या बघू काय करतो तो ??????

No comments:

Post a Comment