मांदार्य.....राजेंद्र खेर
मंजुल पब्लिशिंग हाऊस
अगस्त्य ऋषींच्या कार्याचा आढावा घेणारी ही कादंबरी.देवानी अतिशय काळजीपूर्वक राजकारण करून अगस्त्य ऋषीना देशात कार्य करण्यास निवडले होते . आदिवासी रानटी जमातीत कुटुंबव्यवस्था निर्माण करणे . त्यांना समाजात आणण्यास मदत करणे . नरमांसभक्षणापासून दूर करणे ,शेती आणि इतर उदरनिर्वाहच्या गोष्टी शिकवणे. त्यांनी मेहनतीने संपूर्ण देशात क्रूर दानवांचा विनाश करून एक ठराविक आचारसंहिता आणली.दक्षिणेकडून त्रासदायक ठरलेल्या रावणाचे उच्चाटन कसे करायचे याची योजना आखली गेली. दशरथ राजा आयोध्येतून रामाला बाहेर सोडणार नाही पण रामच रावणाचा नाश करू शकतो त्यासाठी रामाला आयोध्येतून बाहेर काढायची योजना आखली गेली .अगस्त्य ऋषींनी समुद्र पिऊन टाकला म्हणजे नक्की काय केले ..?? रावणाला दहा तोंडे होती म्हणजे काय होते ...?? ब्रम्हदेव म्हणजे नक्की कोण ..???अहिल्येला मिळालेला शाप काय होता ..?? जटायू ..वानर ..हे कोण होते....?? त्यांनी रामाला कशी मदत केली..?? या सर्वांची उत्तरे आपल्याला या कादंबरीत मिळतात .
Tuesday, March 19, 2019
मांदार्य...राजेंद्र खेर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment