ऐवज.... संपादन .. अरुण शेवते
ऋतूरंग प्रकाशन
ऋतुरंगच्या १९९३ ते २००९ या दिवाळी अंकातील काही मोजक्याच लेखांचे एकत्रीकरण करून हा ऐवज अरुण शेवते यांनी आपल्यासमोर ठेवला आहे . मान्यवरांचे लेख संपादकानी यासाठी निवडले.
त्यात त्यांनी अनेक विभाग केले आणि त्यानुसार लेख निवडले आहेत.
मैत्र जीवाचे या विभागात त्यांनी साहिर अमृता यांची मैत्री ..तर बाबासाहेब आंबेडकर आणि लंडनमधील त्यांची मैत्रीण एफ यांचा संवाद ..इंदिरा गांधीनी तिची न्यूयॉर्कमधील मैत्रीण डोरोथी हिला लिहिलेली पत्रे असे लेख आहेत.
अनुभव या विभागात बाबामहाराज सातारकर ,विश्वास पाटील.. जावेद अख्तर यांचे लेख आहेत.
मनातल्या पावसात सुशीलकुमार शिंदे, बाबासाहेब पुरंदरे ,ना. धो. महानोर यासारख्या मान्यवरांनी आठवणी जागविल्या आहेत .
खूप प्रसिद्ध अश्या व्यक्तींचे लेख अनुभव आपल्याला या मोठ्या पुस्तकात एकत्र वाचायला मिळतात .
यात किशोरी आमोणकर,दीप्ती नवल आहेत. राजीव सोनिया गांधींची प्रेमकहाणी आणि शोभा गुर्टू यांचा संसार ही वाचायला मिळतो. उस्ताद झाकीर हुसेन ,हेमामालिनी आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस सांगतात तर डॉ. रघुनाथ मालशेकर, अण्णा हजारे ,शबाना आझमी ,पंडित जसराज माझं जगणं माझी भूमिका यामध्ये दिलखुलासपणे व्यक्त होतात .
६७५ पानांचे मोठ्या बांधणीचे हे पुस्तक म्हणजे नावाप्रमाणेच ऐवज आहे . असे पुस्तक संग्रही असायला हवे . पुस्तकाची किंमत हजार रुपये आहे . पण किमतीच्या मनानं हा ऐवज नक्कीच मोठा आहे .
No comments:
Post a Comment