Wednesday, April 1, 2020

गंधर्वगाथा.... भा. द. खेर

गंधर्वगाथा.... भा. द. खेर 
विहंग प्रकाशन 
वयाच्या नव्वदाव्या वर्षी लेखकाने ही गंधर्वगाथा लिहिली . बरीच वर्षे त्यांच्या मनात हे पुस्तक लिहायचे होते .लेखक स्वतः बालगंधर्वांच्या परिचितांमध्ये होते. बालगंधर्व स्वतः निवेदन करतायत अशी या कादंबरीची मांडणी आहे . यात त्यांनी छोट्या छोट्या भागातून बालगंधर्वांचे चरित्र स्पष्ट केले आहे ..लोकमान्यांनी गाणे ऐकून छोट्या नारायणाला बालगंधर्व दिलेली पदवी . तर शाहू महाराजांच्या शिफारशीने त्यांना किर्लोस्कर नाटक मंडळीत दिलेला प्रवेश त्यांच्याच तोंडून ऐकायला छान वाटते . माणूस केवळ अंगातील कलागुणांने मोठा होत नाही तर त्याला शिस्त आणि संस्कार ही असावे लागतात . हेच ही कादंबरी वाचून स्पष्ट होते .यात त्यांच्या कलाजीवनातील शंभराहून अधिक प्रसंग गुंफले आहेत .

No comments:

Post a Comment