Friday, March 11, 2022

सूर्यास्त...जयवंत दळवी

सूर्यास्त..... जयवंत दळवी
नवचैतन्य प्रकाशन 
दळवींच्या अनेक कथा कादंबरी वरून नाटक चित्रपट बनविले गेले .पण सूर्यास्त हे पहिले नाटक रंगभूमीवर आले आणि त्यानंतर कादंबरी प्रकाशित झाली. त्या आधी 1977 साली दीपावली दिवाळी अंकात सूर्यास्त कादंबरी प्रकाशित झाली होती.
आप्पाजी देशमुख हे थोर स्वातंत्र्यसेनानी .आज त्यांचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री आहे.पण ते मुलांसोबत न राहता आपल्या पत्नीसोबत बाबुरावकडे राहतात.बाबुराव मुख्यमंत्र्यांचा मुलगा आप्पाजींचा नातू.
देवाछाया इमारतीच्या 28 व्या मजल्यावर बाबुराव आणि संताराम राहतात. संताराम मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक .आप्पाजी अजूनही भ्रष्टाचाराविरुद्ध लढतायत .पण हल्लीच्या काळात त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही.आता त्यांची पत्नी ही त्यांच्या विरुद्ध बोलते. आप्पाजी कधी कमिशनराना फोन करतात तर कधी मोठ्या वृत्तपत्रांच्या संपादकांना जाऊन भेटतात पण कोणीही त्यांना साथ देत नाही. उलट मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्या गोष्टी पोचवतात .
देवछाया इमारतीच्या आजूबाजूची झोपडपट्टी हटवायचे प्रयत्न अनेक वर्षे चालू आहेत. पण कोणालाही त्यात यश मिळत नाही .पण शेवटी अशी एक घटना घडते त्यात आप्पाजी आणि झोपडपट्टी कायमचे हटविले जातात .

No comments:

Post a Comment