Wednesday, March 30, 2022

चाणक्याचा मंत्र ....अश्विन संघी

चाणक्याचा मंत्र ....अश्विन संघी 
अनुवाद...उमा पत्की 
साकेत प्रकाशन 
ही कथा दोन पातळीवर घडतेय. त्यांचा काळही वेगळा आहे . तीन हजार वर्षांपूर्वी अलेक्झांडर भारतावर आक्रमण करू पाहत होता तेव्हा विष्णुगुप्त उर्फ चाणक्यने मगध राजा धनानंद यांच्याकडे भारताला वाचविण्याची विनंती केली.
पण उन्मत धनानंद राजाने भर दरबारात त्याचा अपमान केला आणि त्याला कैदेत टाकले. त्या झटापटीत चाणक्याच्या शेंडीची गाठ सुटली .धनानंदच्या जागेवर दुसरा राजा बसवून त्याला भारताचा सम्राट बनविन आणि परकीयांच्या आक्रमणापासून भारत भूमीचे रक्षण करेन तेव्हाच शेंडीची गाठ पुन्हा बांधेन अशी प्रतिज्ञा चाणक्यने भर दरबारात केली.
त्याचवेळी वर्तमानकाळात गंगासागर मिश्रा नावाचा एक इतिहास शिक्षक अशीच काही स्वप्न पाहतोय.त्यांनाही  भारतासाठी एक पंतप्रधान तयार करून सत्ता आपल्या हाती आणायची आहे . त्यासाठी त्यांनी एका मुलीला लहानपणापासूनच  स्वतःच्या मार्गदर्शनाखाली घडवायला सुरवात केलीय. भविष्यात आपल्या पक्षाच्या हातात संपूर्ण भारताची सत्ता येईल अशीच त्यांची योजना आहे .
चाणक्य आणि गंगासागर यांनी आपले राज्यकर्ते कसे घडविले .त्यासाठी त्यांनी कोणते राजकारण वापरले . कुटनीतीचा वापर कसा केला .त्याचीच ही कथा . 
चाणक्यचा एक मंत्र 
चारशे वेळा म्हणा 
चार हजार दिवस प्रार्थना करा 
तेव्हाच मिळेल चाणक्याची  शक्ती .....

No comments:

Post a Comment