Friday, October 14, 2022

कलिंगसंहाराचा न्याय ...श्रेयस भावे

चाणक्य- चंद्रगुप्त- अशोक - त्रिधारा
कादंबरी ...३
कलिंगसंहाराचा न्याय ...श्रेयस भावे
अनुवाद...शिरीष सहस्त्रबुद्धे
चाणक्य चित्रगुप्त अशोक या त्रिधारेतील हे तिसरे पुस्तक 
ही कादंबरी संपूर्णपणे सम्राट अशोक आणि आचार्य चाणक्यभोवती फिरते. सम्राट बिंदुसारनंतर त्याच्या शेकडो पुत्रांपैकी अशोक हा नावडता पुत्र राजा झाला आहे. अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या आचार्य चाणक्याचा त्याला पाठिंबा होता. सम्राट अशोकाची उमेदीची वर्षे युद्ध करण्यात गेली.नंतर तो राज्यकारभारात लक्ष देऊ लागला . पण त्याच्या राज्यकारभाराची पद्धत महाआमत्य आचार्य चाणक्याला पसंद नव्हती. त्याने आपली चाणक्यनीती वापरून सम्राट अशोकला स्त्री आणि मदिराची चटक लावली.आता सम्राट अशोक पूर्वीसारखा चपळ राहिला नाही. त्याचे पोट वाढले हालचाली मंदावल्या. तो सतत स्त्री सहवास आणि दारूच्या नशेत राहू लागला. त्यात त्याने जिच्यावर जीवापाड प्रेम केले ती देवी त्याची प्रेयसी जळून मरण पावली.नाईलाजाने त्याने दुसरे लग्न केले .
सम्राट अशोक हा मौर्य सम्राट चंद्रगुप्त याचा नातू .आर्य चाणक्यने अखंड भारताचे स्वप्न पाहिले आणि ते चंद्रगुप्ताच्या मदतीने पूर्णत्वास नेले .त्यासाठी त्याने अनेक कुटील कारस्थाने केली. मार्गात आडवे येणाऱ्यांची गय केली नाही. 
कलिंग राज्य मौर्य साम्राज्यात यावे यासाठी त्याने अनेक वर्षाची योजना आखली होती.संपूर्ण कलिंग राज्यात त्याचे हेर अनेक वर्षे कार्यरत होते.
शेवटी तो दिवस आलाच. त्या दिवशी मौर्य सेनेने पूर्ण ताकदीने कलिंगाच्या सेनेवर हल्ला केला. कलिंग सेनेनेही पूर्ण ताकदीनिशी त्यांना प्रत्युत्तर दिले.या युद्धात सम्राट अशोकने प्रत्यक्ष भाग घेतला नाही .पण युद्ध संपल्यावर तो रणभूमीवर आला आणि प्रचंड नरसंहार पाहून हादरला. त्याचे अनेक आप्त स्वकीय मित्र इतकेच नव्हे जीला मृत समजत होता ती त्याची प्रेयसी देवीही होती. या युद्धानंतरच त्याचे मनपरिवर्तन झाले आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला.
 या कादंबरीत महाअमात्य आचार्य चाणक्य यांची ही प्रमुख भूमिका आहे .शंभर वर्षाचा हा म्हातारा आज चाकाच्या खुर्चीवर बसून कुशल राजनीती करतो. जे त्याला हवे तो ते कोणत्याही मार्गाने घडवून आणत असतो.त्याच्या हालचाली मंद झाल्या आहेत पण डोके अजूनही तल्लख आहे. सम्राट अशोकचा ही तो नावडता आहे. राज्य भावनेने नाही तर कठोर होऊन चालवावे लागते हीच चाणक्याची भूमिका आहे.अखंड भारत घडविण्यास तो काहीही करू शकतो आणि कोणत्याही  थराला जाऊ शकतो.
एक वाचनीय सुंदर कादंबरी

No comments:

Post a Comment