Friday, October 7, 2022

2019 मोदींनी भारत कसा जिंकला ?..राजदीप सरदेसाई

2019 मोदींनी भारत कसा जिंकला ?..राजदीप सरदेसाई 
अनुवाद....मीना कर्णिक 
अक्षर प्रकाशन
राजदीप सरदेसाई हे टेलव्हिजन न्यूज मिडियातील जेष्ठ नाव . पंतप्रधान मोदी ,अमित शहा ,आणि देशातील मातब्बर राजकारणी त्यांना प्रत्यक्ष नावानी ओळखतात.भारतीय राजकारणाचा त्यांना दांडगा अभ्यास आहे.
या पुस्तकात त्यांनी मोदींनी 2019 च्या निवडणुकीत कसा दणदणीत विजय मिळवला याचे सविस्तर वर्णन केले आहे. या निवडणुकीसाठी शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते.यात कार्पोरेट पद्धतीचे सुनियोजित नियोजन होते. यात नैतिक अनैतिकच्या सीमारेषा पुसल्या गेल्या होत्या.यासाठी प्रचंड संपत्ती आणि साधनांचा वापर केला गेला होता.काहीही करून ही निवडणूक जिंकायचीच हाच एकमेव उद्देश यात होता.
जिथे वर्षानुवर्षे काँग्रेसची सत्ता होती तिथे भाजपने कसा विजय मिळवला.? पाच वर्षात पुन्हा एकदा विरोधकांच्या पुढे जाणे भाजपाला कसे शक्य झाले ? निवडणुकीचा मुख्य मुद्दा कोणता होता ? 
हे निवडणूक युद्ध  मोदी शहानी कसे जिंकले याचे रोमांचकारी विश्लेषण राजदीप सरदेसाई यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment