माझी आणि त्यांची ओळख नव्हतीच .आम्ही दोघेही विरुद्ध स्वभावाचे.तसे ते माझ्या मित्राचे वडील .पण वयाच्या सत्तरीनंतरही स्मार्टफोनद्वारे व्हाट्स अँप फेसबुकचा वापर प्रभावीपणे करणारे . एका पुस्तक परिक्षणामुळे आमची ओळख झाली . हळू हळू मला त्यांची तत्वे समजत गेली . ते ज्योतिषशास्त्र,पत्रिका पहायचे .माझा कधीच यावर विश्वास नव्हता .ते जुने स्वातंत्रसंग्राम पाहिलेले त्यामुळे राजकारण हा आवडीचा विषय .मला राजकारण कधीच आवडले नाही .ते कॉंग्रेसप्रिय त्यामुळे दुसऱ्या पक्षांवर सणकून टीका करायचे ,मी मध्येमध्ये मुद्दाम बत्ती लावायचो.तरीही आमच्यात वाद कधीच झालेच नाही . त्यांच्या फेसबुकच्या कंमेंटवर मी कधीकधी उपरोधिक कंमेंट करायचो पण त्यांनी कधी लक्ष दिले नाही.
पण त्यांना माझे लेखन आवडायचे तसेच माझ्या पत्नीच्या कविताही आवडायच्या. खूप कौतुक करायचे . यावयात आपल्या मनातली मळमळ ते फेसबुकद्वारे व्यक्त करायचे .फेसबुक त्यांच्यासाठी उत्तम व्यासपीठ होते . दिलेला शब्द पाळणे हा ही त्यांचा स्वभाव गुण . आमच्या स्टार्ट गिविंगच्या कार्याला मदत म्हणून एका टीव्हीचा खर्च मी देतो असे सांगितले . मी सवयीप्रमाणे द्याहो आरामात असे बोलून मोकळा झालो .पण त्यांनी पैसे माझ्या कंपनीच्या गेटवर येऊन दिले . आता आहेत ते घेऊन ठेव नंतर संपतील असे म्हणत पैसे हातात दिले . मधेच पुण्यात एका व्यक्तीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली त्यांना हे कळताच ताबडतोब काही पैसे त्याला पाठवून दिले . शिक्षणक्षेत्रात कोणतीही मदत करायला ते नेहमीच तयार असतात .असे हे आमचे सर्वांचे बाबा श्री. अशोक सिध्येय . आज या वयातही सामाजिक जाणिवेचे भान ठेवून आपल्या परीने समाजाला काहीतरी देण्याचे प्रयत्न करतायत. समाजाचा एक हिस्सा बनून आपली मते स्पष्टपणे सोशल मीडियावर मांडतायत . भले कोणी त्यांच्याकडे लक्ष देवो न देवो ते त्यांच्या मनाला पटते ते करीत राहणार.
बाबा तुम्हाला खूप उदंड आयुष्य लाभो आणि तुमचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहो हीच इच्छा.
© श्री. किरण बोरकर
Friday, October 27, 2017
अशोक सिध्येय
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment