ऑपरेशन ब्लॅक थंडर.... सरब जित सिंग
साग पब्लिकेशन
सुवर्णमंदिरातील 1984 ला झालेल्या ऑपरेशन ब्लूस्टार नंतर पंजाबातील अतिरेकी कारवाई आणि दहशतवाद रोखण्यासाठी ऑपरेशन ब्लॅक थंडर चालू झाले . त्यावेळी लेखक सरब जित सिंग अमृतसरचे उपायुक्त होते . त्यांच्या लेखणीतून या कारवाईचा थरारक लेखाजोखा पुस्तकात उतरला आहे . लेखकाने आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत . त्यावेळच्या कांग्रेस सरकारची भूमिका, अकाली दलाची मुस्कटदाबी,भिद्रनवाले गटाला दिलेले छुपे उत्तेजन याची सडेतोड चिरफाड लेखक करतात . ऑपरेशन ब्लूस्टार मुळे पंजाब उग्र बनला आणि त्याचा परिणाम पंतप्रधानांच्या हत्येत झाला . त्यानंतर आलेल्या राजीव गांधींनी शांततेसाठी खूप प्रयत्न केले .ऑपरेशन ब्लॅक थंडरमुळे या दहशदवादाला खूपच पायबंद बसला. 1990 च्या दशकात निवडणुका होऊन परिस्थिती नियंत्रणात आली . या काळातील अनेक गूढ आणि पडद्याआड असणाऱ्या व्यक्तींना ,घटनांना लेखक समोर आणतात .लेखक 1987 ते 1992 याकाळात अमृतसरचे उपायुक्त होते.दहशतवाद विरोधी लढा आणि त्यासाठी लागणारी समर्पण वृत्ती व धैर्याबद्दल सरकारने 1989 मध्ये त्यांचा पद्मश्री देऊन सन्मान केला .
Monday, December 17, 2018
ऑपरेशन ब्लॅक थंडर.... सरब जित सिंग
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment