रिबेल सुलतान्स ....मनु एस. पिल्लई
अनुवाद.....तृप्ती कुलकर्णी
एक प्रकाशन
खिलजी ते शिवाजी महाराजांपर्यंतचे दख्खन या कालावधीचा इतिहास या पुस्तकाद्वारे मनु पिल्लई यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय .लेखक अतिशय बारकाईने दख्खनच्या इतिहासाचा अभ्यास करून तो आपल्यासमोर मनोरंजकपणे सादर करतात. एकूण सात रंजक प्रकरणातून दख्खनची मांडणी करण्यात आलीय. प्रत्येक प्रकरणात महत्वाची पात्रे घेऊन त्यांचे राजकारण डावपेच राज्यशासन ,वैयक्तिक गोष्टी अधोरेखित केले आहे.१२०६ पासूनचा दिल्लीच्या सल्तनतची स्थापना झाली तेव्हापासून १७०७ ला बादशहा औरंगजेब याचा मृत्यू या सगळ्या घटना आपल्यासमोर येतात.
महाराष्ट्रात दख्खनची ओळख शिवाजी महाराजांच्या मोहिमेमुळे होते .पण यात शिवाजी महाराजांची ओळख सर्वात शेवटी आली आहे .
No comments:
Post a Comment