"और कितनी बार आऊ ??मेरा हि पैसा लेने के लिये"?? माझ्या शेजारील ती वृद्ध महिला रडावेल्या आवाजात समोरच्या क्लार्कला विचारत होती." दस हजार रुपये के लिये 4 बार आना पड रहा है"?दादर पोस्ट ऑफिसमध्ये ती माझ्यासमोर उभी होती.NSC चे पैसे तिला पाहिजे होते ,मीही त्यासाठीच उभा होतो .समोरचा क्लार्क हताशपणे तिच्याकडे पाहत बसला होता 'मॅडम ,सर्वर डाउन है"मै कूछ नहीं कर शकता".दोघांचीही अडचण होती.बोलता बोलता दोघांचाही तोल सुटला आणि त्याने संतापून त्याच्या वरिष्ठांकडे तक्रार करायला सांगितली.तीहि तनतनत आत गेली .पण रिझल्ट आम्हा तिघांनाही माहित होता .ती आत जातात परत गरीब चेहऱ्याने तो क्लार्क मला म्हणाला "काय करू सर??रोज सर्वर चा प्रॉब्लेम आहे ,आणि सर्वर आहे चेन्नईला".कोणाला काय आणि किती सांगणार रोज रोज ??बघा इथे काउंटरच्या मागे सगळे गप्प बसून आहेत ,चार मिनिटात NSC क्लिअर होऊन पैसे मिळतात,पण अश्या प्रॉब्लेममुळे सगळ्यांच्या शिव्या खाव्या लागतात." कोणीही काहीही बोलतो ,मग शेवटी आमचाही तोल सुटतो"
अर्थात या प्रॉब्लेमची थोडीफार माहिती असल्यामुळे मी शांत बसलो.पण असे शांत राहून प्रॉब्लेम सुटू शकतील का ?.समोरच्या क्लार्कचा पूर्ण दिवस काही काम न करता भरला गेला ,पण त्या वृद्धेचे काय ??? माझाही दिवस फुकट गेला .
आज सगळ्या सेवा संपूर्णपणे संगणीकृत झाल्या आहेत पण ते वापरण्यासाठी कितीजण सक्षम आहेत .पैसे घेताना ह्यांच्याकडे बरेच पर्याय असतात पण देताना ह्यांच्याकडे न देण्याची बरीच कारणे असतात ,सर्व नियम लागू असतात .परत अश्या विभागात पैसे गुंतवायचे कि नाही याचा विचार नक्कीच माणूस बाहेर पडताना करतो.
Friday, August 12, 2016
सरकारशाहीं
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment