AAKHARI SACH
आखरी सच
नवी दिल्लीमध्ये एकाच कुटुंबीयांनी समूहायिक आत्महत्या केल्या होत्या.त्याच घटनेचे कथानक घेऊन ही सिरीज बनविण्यात आली आहे.
राजावत परिवारात एकूण अकरा जण आहेत. भुवन अमन हे दोन भाऊ ,त्यांच्या पत्नी ,आई ,भाची,आणि मुलं असा परिवार आहे. अमनची डेअरी आणि मिठाईचे दुकान आहे.
एके दिवशी पहाटे घरातून काही हालचाल दिसत नाही आणि कुत्रा सारखा भुंकतोय म्हणून शेजारी घरात जातात आणि त्यांना सर्व कुटुंब छताच्या पाईपला लटकलेले आढळते.भुवनची आई म्हातारी आहे म्हणून तिने बेडरूमध्येच फाशी लावून घेतली. सारी दिल्ली या प्रकरणामुळे हादरली.
इन्स्पेक्टर अनया उर्फ अन्या तरुण हुशार अधिकारी . तिच्याकडे ही केस तपासासाठी दिली जाते.सर्वप्रथम ही आत्महत्या नसून खून आहेत असा तिचा समज होतो .पण जसजशी ती तपासात गुंतत जाते तशी अधिकाधिक गोंधळात पडते.
तिला पुरावे सापडत जातात आणि ती शेवटी एका निष्कर्षावर पोचते.
अंतिम सत्य काय आहे ??
तमन्ना भाटिया इन्स्पेक्टर अन्याच्या तडफदार भूमिकेत आहे. तर अभिषेक बॅनर्जीने गूढ भुवन रंगविला आहे.
No comments:
Post a Comment