Wednesday, October 4, 2023

प्रतिपश्चंद्र

प्रतिपश्चंद्र
डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे 
न्यू इरा प्रकाशन 
विजयनगर साम्राज्यातील राजांना आपल्या भूमीवर आज ना उद्या परकीय आक्रमण होणार हे माहीत होते.कारण शत्रू उत्तरेकडून निघाला होता. म्हणून त्यांनी दक्षिणेकडील सर्व राज्यांचा खजिना एकत्र करायला सुरुवात केली.
साधारण सोळाशे हत्तीवरून ती प्रचंड संपत्ती एके ठिकाणी एकत्र केली गेली .पण आज ना उद्या ते ठिकाण त्यांना सापडेल म्हणून सुमारे पंचवीस वर्षे हळूहळू तो खजिना पुन्हा दुसरीकडे हलविला गेला .
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ताबडतोब महाराजांनी दक्षिणेकडे मोहीम काढली. या मोहिमेत ते सर्वाना भेटले .अनेक करार केले .अनेक लोक त्यांना भेटायला यायचे .त्यात ते दोघे होते.चेहऱ्यावरून पितापुत्र वाटत होते .एक वृद्ध तर दुसरा तरुण .दोघांनी शिवाजी महाराजांची एकांतात भेट घेतली आणि विजयनगरच्या खजिन्याचे रहस्य त्यांना सांगितले.महाराजांनी आपण त्या खजिन्याचे मालक होणार नाही तर रक्षक होऊ असा शब्द त्यांना दिला .
बहिर्जी नाईक आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एक योजना आखून तो खजिना बंद केला .बहिर्जी नाईकांनी काही शिलेदारांची निवड त्या खजिन्याच्या रक्षणासाठी केली.आता त्या खजिन्याची जबाबदारी त्या शिलेदारांवर पिढ्यानपिढ्या राहणार होती. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते रहस्य सुपूर्द केले जात होते.
 मानसोपचारतज्ञ डॉ. रवीकुमार औरंगाबादला एका कॉन्फरन्ससाठी आपला मित्र आदित्यसोबत आला होता. न्यायमूर्ती कृष्णकांत दीक्षित यांच्या वाढदिवसाची पार्टीही त्याच हॉटेलमध्ये होती जिथे रवीकुमार आणि आदित्य थांबले होते.न्यायमूर्ती कृष्णकांत दळवी यांनी रवीकुमारवर विशेष लक्ष दिले .त्यांनी त्याला एक बुद्धमूर्ती गिफ्ट म्हणून दिली.पण दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या रूममध्ये कृष्णकांत दीक्षित गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले.आय बी ऑफिसर विजय मानेने त्यांच्या मृत्यूची जबाबदारी रवीकुमार  टाकली.
रवीकुमार आणि आदित्यच्या जामीनाची व्यवस्था प्रियल ह्या तरुणीने केली .पण आता डॉ. रवीकुमारला सत्य काय आहे ते शोधून काढायचे आहे .त्याने बुद्ध मूर्तीची कसून पाहणी केली आणि त्याला पहिला संदेश सापडला.
वीस वर्षांपूर्वी  हम्पीच्या भग्न अवशेषात प्रशील सोनवणेला अथक परिश्रमातून हवी ती वस्तू सापडली आणि तो ताबडतोब डॉ.रंगनाथस्वामींकडे आला .डॉ.स्वामींनी ती वस्तू चेक करून त्याला सरकारी वकील कृष्णकांत दीक्षित यांच्या हाती सुपूर्द केली होती.पण काहीवेळातच त्याला डॉ.स्वामींच्या खुनाची वार्ता कानावर आली .आपल्याही जीवाला धोका आहे हे तो समजून गेला .घरी गेल्यावर त्याला आपली पत्नी मृतावस्थेत सापडली .तो आपल्या मुलीला घेऊन ताबडतोब फरार झाला .
काय आहे हे खजिन्याचे रहस्य ज्यामुळे अनेकांचे जीव जातायत. रवीकुमार आणि आदित्य ,प्रियल ह्या खजिन्यापर्यंत पोचतील का ?

No comments:

Post a Comment