GUNS AND GULAABS
गन्स अँड गुलाब
साधारण 1990 चा काळ .गुलबागंज आणि शेरपूर ही लगतची गावे.दोन्ही गावात अफूची शेती होते.शेतकऱ्यांनी किती अफू पिकवायची हे सरकार ठरवते. गांची गुलाबगंजचा अफूचा तस्कर तर नबीद शेरपूरचा . अनधिकृत अफू त्यांच्या ताब्यात असते.दोघात मोठे वैर आहे.
गांचीचा उजवा हात टायगर नबीदकडून मारला जातो .टायगरचा मुलगा टिपू सरळमार्गी मेकॅनिक .तो वडिलांच्या विरुद्ध स्वभावाचा .चित्रलेखावर तो मनापासून प्रेम करतो.चित्रलेखा शाळेत टीचर आहे.
नार्कोटिक्स विभागातून नवीन अधिकारी अर्जुन वर्मा गुलाबगंजला बदली होऊन आलाय .अतिशय प्रामाणिक अधिकारी म्हणून त्याची ओळख आहे.पण इथे त्याच्या जुन्या शत्रूने ब्लॅकमेलिंगमध्ये अडकविले आहे.
आत्माराम नबीदचा साथीदार.त्यानेच टायगरचा खून केलाय आता तो गांचीच्या मागे आहे.
एक अफूची मोठी ऑर्डर गांचीला कोलकत्यातील सुकांतोकडून मिळाली आहे. गांची ही ऑर्डर पूर्ण करेल पण त्या आधीच अपघात होऊन कोमात जातो. इथे आत्मारामचे साथीदार टिपूला त्याच्या बापाला कसे मारले ते सांगून भडकवितात आणि त्याच रागात टिपू हातातील स्पॅनरने दोघांना ठार मारतो आणि सगळा गुलाबगंज त्याला स्पॅनर टिपू नाव देतात.आपल्यावरील खुनाचा आरोप दूर होण्यासाठी टिपू गांचीच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारतो.
गांचीच्या अपघातामुळे अफूची ऑर्डर नबीद स्वीकारण्याचा प्रयत्न करतो .पण अर्जुन वर्मा गांची आणि नबीदकडील अफू जप्त करतो .आता गांचीचा मुलगा , नबीद ,टिपू ,आत्माराम ,अर्जुनचे जुने शत्रू तो जप्त केलेला अफू ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत .यात कोण यशस्वी होईल ?
यात शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची ही वेगळी कथा आहे. ते विद्यार्थी टायगरच्या खुनाशी ,चित्रलेखा आणि टिपूशी संबंधित आहे.
सतीश कौशिक गांची, राजकुमार राव टिपू ,दिलंक्यूर सलमान अर्जुन वर्मा ,आणि गुलशन देवाईः आत्माराम अशी एक तगडी स्टारकास्ट या सिरीजमध्ये आहे .सिरीजचा दुसरा सीजनही येईल अशी अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment