Friday, October 9, 2020

मित्रयादी

मित्रयादी 😊
फेसबुक सुरू करून झुक्याबाबाने आपल्यावर फारच उपकार केले असे म्हणायचे😀😀
 म्हणजे बघा ना....आधी लांबची मित्रमंडळी जवळ आली मग नातेवाईक... नंतर हरवलेल्या मित्रांचा शोध सुरू झाला...बरेचसे सापडलेही 🤔🤔 पण त्याचबरोबर मित्रांचे मित्रही आपल्या यादीत आले . काहींना आपण रिक्वेस्ट पाठविल्या तर काहींनी आपल्याला.
पण पुढे वेगळीच गंमत सुरू झाली. आता मित्रयादीत आले म्हणजे ओळख वाढविणे होणारच... 
आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी.. आठवणी शेयर करण्यासाठी... आपण आपली वॉल वापरू लागलो.🙄🙄
 काहींना आपली वॉल आवडू लागली .अर्थात आपल्याला ही काहींचे चेहरे तर ...काहींची वॉल आवडू लागली. काहींशी पर्सनली बोलून ओळख वाढवावी असे वाटू लागले आणि तिथेच मोठा घोळ झाला 😲
आता मित्रयादीत सुरू झाली हेरगिरी.काही याचा स्वार्थासाठी वापर करू लागले ..तर काही नुसते लक्ष ठेवून राहिले.😎😎😎
 म्हणजे कसे ते बघा हा ...आपला नेहमी भेटणारा गप्पा मारणार मित्र आपल्या लिस्टमध्ये आहे. पण तो आपल्या पोस्टला कधीच कॉमेंट देत नाही.. आहो लाईकही करत नाही. पण असतो मात्र दिवसभर ऑनलाईन .
तर आपल्याला लांबून ओळखणारे आहेत.तेही नेहमी दुसऱ्यांच्या पोस्टवर लाईक आणि कॉमेंट देत असतात पण आपल्या पोस्ट त्यांना कधीच दिसत नाहीत.😔😔
 बरेच पुरुष नेहमी स्त्रियांना स्वतःहून रिक्वेस्ट पाठवतात.काहीजणी त्या स्वीकारतात मग लगेच त्यांच्याशी ओळख वाढविणे सुरू होते. अर्थात प्रत्येकाचा हेतू वेगळा असतो . रिक्वेस्ट स्वीकारलेली स्त्री बहुतेकवेळा रिस्पॉन्स देत नाहीत उलट त्यांना झापतात आणि ब्लॉक करतात . मोजक्याच काहीजणी रिस्पॉन्स देतात नशीब चांगले असेल तर दोघेही चांगले मित्र बनू शकतात .
 काही स्त्रियाच पुरुषांना रिक्वेस्ट पाठवतात.पुरुष खुश .. ताबडतोब तिच्या वॉलवर जाऊन तिच्या पोस्ट.. फोटो.. लाईक/ कॉमेंट करायला सुरुवात करतो . पण ही आपली ढिम्म.... तिला याची काही गंधवार्ताच नसते . ती विसरूनच गेलेली असते.... तो हैराण ... मग या बाईने रिक्वेस्टच का पाठवली ....?? बरे ही स्त्री फेसबुक वर नेहमी ऍक्टिव्ह बरे का ....पण तुमच्याकडे लक्ष द्यायला तिला वेळ नाही....😊😊
 बरे असे का होते ....?? आता आपणच आपल्याला हा प्रश्न विचारतो . लिस्टमध्ये तर दोन हजार मित्र दिसतायत . त्यातील पन्नास टक्के तर प्रत्यक्षात भेटलेले . ऐंशी टक्के तर पूर्ण ऍक्टिव्ह . दहा टक्के पूर्ण झोपलेले . लोक चिडवू नयेत... मूर्ख समजू नये...म्हणून  अकाउंट उघडून बसलेले . तर दहा टक्के कधीकाळी वेळ मिळेल तेव्हा फेसबुक वर येणारे . तरीही आपल्या पोस्टवर जेमतेम दहा टक्केच मित्र येतात ....??  का ...?? काय कारण ...?? खरोखर आपल्या पोस्ट मित्रांना आवडत नाहीत ...?? की त्यांना आपल्या पोस्ट दिसत नाहीत ..?? की त्यांनी स्वतःची लिस्ट वाढविण्यासाठी आपला वापर केलाय ....?? असे बरेच प्रश्न आपल्या मनात येतात ..
कदाचित हे मित्र आपल्यावर हेरगिरीतर करीत नाहीत ना ...?? आपल्या पोस्टचा वैयक्तिक जीवनाशी काही संबंध असेल याचा शोध घेतायत ....??  आपल्या पोस्टमधून ते त्यांना पाहिजे तो अर्थ काढतायत ...??
मग आपणही विचार करू लागतो . झोपलेले मित्र कशाला लिस्ट मध्ये ठेवा. ज्यांना आपली कदर नाही त्यांना का लिस्टमध्ये ठेवा ...?? असा विचार करू लागतो आणि मग हळू हळू अश्याना लिस्टमधून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू होते .
आता यावर तुम्ही म्हणाल .. आपण लक्ष द्यायचे नाही अश्यांकडे . आपल्या आनंदासाठी लिहावे वगैरे वगैरे पण आम्ही खूप साधी सरळ माणसे आहोत हो .. आपल्या मनातील भावना शब्दात मांडून तो मित्रांसोबत शेयर करावा इतकीच आमची छोटी इच्छा असते .यात आमचे काय चुकते हो ....??
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment