"परवाची पाचशे मीटर मीच जिंकणार बरे का मित्रा".
"त्यादिवशी शंभर मिटरलाही हेच बोलला होतास. पण तिसरा आलास...."
"हो रे ...!!मध्येच ठेच लागली आणि वेग मंदावला म्हणून ".....
"आता कारणे देऊ नकोस"....
"कारणे नाहीत रे ....पण होते असे कधी कधी तरीही गेले वर्षभर मी सगळ्याच स्पर्धेत भाग घेतला.
"त्याबाबतीत तुझे अभिनंदन ...पण तुला त्रास होत नाही का.... ??
"अरे त्रास कसला ...इतके तर सहन करायला पाहिजेच . म्हणून तर तुमच्याबरोबर रोज प्रॅक्टिस करतोय .तुम्ही सांभाळून घेताय हेच महत्वाचे"
"ह्या ...!! आम्ही कसले सांभाळून घेतोय. उलट तूच किती उत्साहात सराव करतोस .एक दोन वेळा पडलास तेव्हा भीयालोच आम्ही .पण तू त्यातूनच उभा राहिलास".
"अरे हे... सर्व तुमच्यामुळे झाले .नाहीतर धावणे हे स्वप्नच राहिले असते".
"ह्या ...!! तू मनात आणलेस ना म्हणून हे सर्व .शेवटी आपल्या मनात ठरविले तेच पूर्ण होऊ शकते हे दाखवून दिलेस तू. चल आता निघुया.उशीर होईल मग मलाच बोलशील किती फास्ट चालतोस तू ???
"अरे ..हो.. हो.. हा. पाय तरी जोडून दे मला.आता आरामात बसलो. म्हणून पाय काढून ठेवला नाहीतर हल्ली खूप चावत बसतो आतून. जुना झालाय ना . त्याचा पट्टा सारखा सटकतो.पण सवय झालीय याची म्हणून ही रेस होईपर्यंत चालवतो .मग नवीन घेईनच . चल निघुया.
© श्री. किरण बोरकर
Wednesday, November 8, 2017
शर्यत
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment