Tuesday, July 13, 2021

कलि.. एक शोध ...१…विनय राजेंद्र डोळसे

कलि.. एक शोध ...१…विनय राजेंद्र डोळसे
अठ्ठावीस युग झाल्यानंतर विश्वाचा नाश होईल असे म्हटले जाते आणि म्हणूनच देवानी कलियुग निर्माण केले.आणि त्यासाठीच कलिचा जन्म झाला .
उत्तर भारतातील चुन्ड देशाच्या प्रधानाची मुलगी कात्यायनीच्या पोटी कलिचा जन्म झाला. पण त्याचा बाप कोण हे माहीत नसल्याने त्यांना वाळीत टाकले गेले .पुढे कलिला आपल्यातील सामर्थ्याची कल्पना आली आणि चुन्डच्या राजाश्रयामुळे तो राजा बनला .आपल्या मायावी शक्तीच्या सामर्थ्याने तो अजिंक्य झाला.
आपला पिता कोण .…?? हा प्रश्न त्याला नेहमीच पडायचा. विष्णू त्याचा पाठीराखा होता. पण विष्णुही सांगू शकत नव्हता .शेवटी त्याने संतापून देवलोकावर स्वारी केली.
पुंण ऋषी आणि आलवक ऋषी कलिला रोखण्याचा प्रयत्न करत होते .विष्णूच्या सल्ल्याने त्यांनी एका महान देवाच्या केसांचा साखळदंड बनवून कलिला बांधून टाकले .
पुढे विष्णूने कृष्णाचा अवतार घेतला आणि युधिष्ठराच्या मदतीने कलिची चातुर्याने सुटका केली .
कलियुग निर्माण व्हावे हीच ब्रम्हा विष्णू महेश यांची इच्छा होती आणि त्यासाठीच त्यांनी कलिला निर्माण केले .
कलिने त्या साखळदंडातून सुटका करून घेतली .पुढे काय .....???
हा भाग पहिला आहे .

No comments:

Post a Comment