Saturday, July 31, 2021

मिशन वारी….अमोल पोतनीस

मिशन वारी….अमोल पोतनीस 
आषाढातील महत्वाचा सण म्हणजे एकादशी.लाखो भक्त माऊलीचे नाव घेत वारीत चालतात .अतिशय सुनियोजित योजनाबद्ध अशी वारीची आखणी असते. यात प्रवासाचे वेगवेगळे टप्पे असतात .सर्व वारकऱ्यांच्या मुखी फक्त माऊलीचा जप असतो. सर्वाना त्या वारीत सुरक्षितता वाटत असते . पण यावेळच्या वारीत काहीतरी भयंकार घडणार असा सुगावा स्पेशल इन्व्हेस्टीगेशन ब्युरोला लागला आणि त्याचा छडा लावण्याची जबाबदारी त्यांनी कॅप्टन आकाश सुमंतवर टाकली.
संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा मोठा टप्पा म्हणजे पुणे ते सासवड हा साधारण बत्तीस किलोमीटरचा प्रवास.त्यात चार किलोमीटरचा घाट . हा घाटमाथा लाखो वारकर्यांनी फुलून गेलेला असतो. या टप्प्यातच काहीतरी घडणार अशी खबर आकाशला मिळाली.
काय घडणार होते त्या वारीत....?? लाखो लोकांच्या जीवावर बेतणारा कट कॅप्टन आकाश आणि त्याचे सहकारी उधळून लावतील का ....?? कशा शोध घेणार ते ....?? 
हे सर्व कळण्यासाठी मिशन वारी वाचायला हवे.
लेखकाला साहसकथेची आवड कै. सुहास शिरवरकरांमुळे लागली आणि म्हणून हे पुस्तक त्यांना अर्पण केले आहे.

No comments:

Post a Comment