अलक
"आताच्या काळात प्रेतालाही चार माणसे जमणे मुश्किल."त्याचा आजारी बाप हातात हात घेऊन पुटपुटला.
"काळजी नको बाबा, पन्नास माणसे नक्कीच जमतील तुमच्या अंत्ययात्रेला."त्याने ही हसत उत्तर दिले.
आज खरोखरच पन्नास माणसे बाबांच्या अंत्ययात्रेत उपस्थित होती.स्मशानभूमीतून बाहेर पडल्यावर त्याने प्रत्येकाच्या हाती दोनशेची नोट देत नमस्कार केला. "पैशाने हल्ली बरीच कामे होतात हे पटले आज."तो माझ्याकडे पाहून डोळे पुसत म्हणाला.
© श्री.किरण कृष्णा बोरकर
No comments:
Post a Comment