Thursday, February 20, 2020

गेम..थरारक सत्य ...विजयकुमार बांदल

गेम..थरारक सत्य ...विजयकुमार बांदल
आमचा चौथा स्तंभ प्रकाशन
80 च्या दशकात मुंबईत गॅंगवॉर खूप फोफावले होते . दाऊद इब्राहिम...अरुण गवळी..रमा नाईकसारखे नवीन दादा उदयास येत होते.तर हाजी मस्तान .. वरदाराजनसारखे अस्ताला जात होते. यातील एका नवीन दादाची कहाणी विजयकुमार बांदल यांनी या पुस्तकात मांडली आहे .त्याचे नाव बाबू रेशीम.
बाबू रेशीमचा उदय आणि अस्त याची कहाणी जशीच्या तशी या पुस्तकात मांडली आहे .खरे तर मुंबई गॅंगवॉर हा खूप मोठा विषय आहे . लिहायला गेले तर एकामागून एक असे अनेक फाटे फुटतील आणि त्यावर दहा पुस्तके लिहिली जातील.
पण लेखकाने यात फाटे फुटू न देता केवळ बाबू रेशीम या एकाच व्यक्तिरेखेवर आपले लक्ष केंद्रित आहे. गावावरून आलेला बाबू माझगाव डॉक मधील कॅन्टीन मध्ये कामाला लागतो आणि पुढे तेथील युनियन लीडर बनतो .  रमा नाईक आणि अरुण गवळी यांच्याशी मैत्री करून बाबू दादा बनला आणि लूटमार.. खंडणी अशी कृत्ये करू लागला . शेवटी 5 मार्च 1987 ला जेकब सर्कल पोलीस कोठडीत त्याच्या शत्रूने हल्ला करून हत्या केली .
लेखक विजयकुमार बांदल हे सकाळचे क्राईम रिपोर्टर होते .गेली चाळीस वर्षे ते गुन्हेगारी क्षेत्रात राहून प्रामाणिकपणे आपले काम करतायत .एक अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे .
पुस्तकाला भरकुमार राऊत यांनी प्रस्तवना दिली आहे .
संपूर्ण गॅंगवॉरची माहिती न देता फक्त ठराविक एका दादावर काढलेले हे  पुस्तक असेल. यात त्यांनी बाबू रेशीमवर कोठडीत केलेल्या हल्ल्याचे इतके अचूक वर्णन केले आहे की जणू तेच तिथे हजर राहून संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करतायत असे वाटते .

No comments:

Post a Comment