Saturday, May 15, 2021

कालचक्र रहस्यमय जंगलाची गोष्ट.... अनिरुद्ध काटकर

कालचक्र रहस्यमय जंगलाची गोष्ट.... अनिरुद्ध काटकर
ही कथा आहे एका घनदाट अरण्याची. हे अरण्य दोन भागात आहे. 
एक भाग निसर्गसौंदर्याने नटला आहे .तर दुसरा भाग तितकाच क्रूर आणि भयानक आहे. मानवाला या अरण्यात जाता येत नाही कारण त्यात प्रवेश करायचा मार्गच कोणालाही माहीत नाही.
तरीही अजय शिरसागर उर्फ अण्णा आणि त्याचा मित्र वसंत यांनी जीवावर उदार होऊन त्या अरण्यात प्रवेश केला ते तिथे फिरले पण येताना अण्णा एकटेच बाहेर आले आणि वसंत तीथेच अडकला . ते साल होते १९९० 
आज २०२०साली अण्णांचा मुलगा संस्कार आणि पुतण्या आकाश अरण्यात जाण्यासाठी उत्सुक आहेत. अण्णा त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही एके रात्री संस्कार आणि आकाश अपुऱ्या माहिती आधारे त्या अरण्यात प्रवेश करतात.
जिथे त्यांची भेट अण्णांचा मित्र वसंतशी होते. वसंत अजूनही तरुणच दिसत असतो .गेले तीस दिवस मी या अरण्यात अडकून पडलो आहे असे तो त्यांना सांगतो. तो ती सर्व हकीकत सांगतो जी अण्णांनी संस्कार आणि आकाशला सांगितलेली असते. 
पण त्या गोष्टीला तर तीस वर्षे उलटून गेलेली असतात...मग वसंत फक्त तीस दिवस झाले असे का सांगतो ...?? 
वसंत त्या दोघांनाही  वीस दिवस अरण्याची संपूर्ण सफर घडवून आणतो. ती सफर पूर्ण व्हायला वीस दिवस लागतात .अरण्याबाहेर निघताना संस्कार आणि आकाश आपल्यासोबत वसंतलाही घेऊन जाण्याचे ठरवितात.पण कुठेतरी काही चुकते आणि आकाश आतच राहतो . 
संस्कार आणि वसंत घरी परतात तेव्हा वीस वर्षे उलटून गेलेली असतात आणि अण्णांचा मृत्यू झालेला असतो. पण मृत्यूपूर्वी त्यांनी एक डायरी आपल्या मुलीच्या हाती दिलेली असते . यात अरण्याची सगळी माहिती ...सगळी रहस्य लिहिलेली असतात.
आता संस्कार आणि वसंतवर आकाशला परत घेऊन येण्याची जबाबदारी आहे.पण यावेळी त्यांच्या हातात अरण्याचे रहस्य आहे . 
असे काय आहे या अरण्यात ....??
काय आहे कालचक्राचे रहस्य ...??
पुस्तक अतिशय गुंतागुंतीचे आहे . कधी कधी तर आपण बालकथा वाचतोय असे वाटते. विज्ञान ,पुराण आणि पर्यावरण यांचा मिलाफ करून ही कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केला गेलाय .

No comments:

Post a Comment