Sunday, May 9, 2021

लेट भुट्टो ईट ग्रास .....शौनक अगरखेडकर

लेट भुट्टो ईट ग्रास .....शौनक अगरखेडकर
अनुवाद...अक्षय कुल्हे
१९६५ साली पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुट्टो यांनी जर भारताने बॉम्ब बनवला तर एक वेळ पान किंवा गवत खाऊ ..उपाशी ही राहू पण आम्ही आमचा बॉम्ब बनवूच असे वक्तव्य केले होते.
१९७४ साली भारताने हेरगिरीसाठी स्थापन केलेल्या एका विंगमध्ये सबलोकची नेमणूक झाली.
सबलोक १९७१ च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामात लढला होता . युद्धाचे बक्षिस म्हणून आपल्या पायात तोफेच्या गोळ्यांचे छरे  घेऊन फिरत होता. 
अरोराने त्याला त्या विंगमध्ये आणले आणि अँनालिस्ट म्हणून ठेवले. परदेशातून वेगवेगळ्या हेरांकडून आलेल्या बातमीचा रेकॉर्ड ठेवणे त्या फाईल करणे इतकंच त्याचे काम .
पण त्या दिवशी इस्लामाबाद हाय कमिशनकडून आलेल्या साध्या टेलिग्रामने त्याचे लक्ष वेधून घेतले.पाकिस्तानी इंटरनेशनल एअरलाईन्सच्या एका हवाईसुंदरीच्या माध्यमातून ती माहिती आली होती.
कुतूहल म्हणून सबलोकने त्या माहितीचा पाठपुरावठा करण्याचे ठरविले आणि त्याच्या हाती काही धक्कादायक माहिती लागली . त्या माहितीचे कनेक्शन युरोपातील नेदरलँडशी होते.
आपल्या गॉडफादर अरोराची मदत घेऊन सबलोकने त्याच्या साहेबाना पटवून दिले की  पाकिस्तान अणुबॉम्ब निर्मितीचे प्रयत्न करीत आहे .
आता त्या  मोहिमेचा पाठपुरावठा करून ती मुळापासून उखडून टाकण्याची जबाबदारी सबलोक आणि अरोरावर पडली . खरच ते हे षडयंत्र रोखू शकतील का ...?? 
लेखकाने दोन भागात हे पुस्तक लिहिले आहे . हे पुस्तक पहिला भाग आहे . यात शेवट अनुत्तरित आहे .त्यासाठी दुसरा भागही वाचायला हवा .
लेखकाने १९७५ च्या कालखंडाचे उत्तम वर्णन केले आहे . सरकारी गुप्तहेरांचे ऑफिस ,लाल फितीचा कारभार ,प्रत्येक गोष्टीचा पुरावा देणे प्रतिज्ञापत्र सादर करणे, साहेबाना पटवून देणे ..पुन्हा मोठ्या साहेबांकडे जाणे, मोहीमेला परवानगी मागणे,खर्चात काटकसर करणे. एकूणच त्यावेळी आपले सरकार गुप्तहेरखाते कसे चालवत असेल याची कल्पना येते .
पुस्तक वाचता वाचता आपण त्यात गुंतून जातो हे मात्र नक्की.

No comments:

Post a Comment