Sunday, August 20, 2017

मी अश्वत्थामा चिरंजीव .. अशोक समेळ

मी अश्वत्थामा चिरंजीव .. अशोक समेळ
खरे तर अशोक समेळ नाटककार .पण बरीच वर्षे महाभारतातील हे एक पात्र त्यांच्या मनात घर करून राहिले होते . त्यातूनच निर्माण झाली ही महाकादंबरी .कपाळावर जन्मजात निलमणी असलेला गुरू द्रोणाचार्यांचा हा पुत्र  एक दुर्लक्षित खलनायक म्हणून ओळखला जातो .श्रीपरशुराम,हनुमान,बिभीषण,बळीराजा,महर्षी व्यास,कृपाचार्य  व अश्वत्थामा हे सप्तचिरंजीव ओळखले जातात . पण अश्वत्थाम्याला चिरंजीवीत्व हा शाप समजला जातो . त्याने पांडवांच्या वशजांचे झोपेत असताना केलेल्या संहाराची शिक्षा म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाकडून त्याच्या कपाळावरील मणी कापून काढला.त्यामुळे  झालेली भळभळती जखम घेऊन दारोदार  तेल मागणार योगी असा त्याचा लौकिक बनला . अश्या अश्वत्थामाच्या आत्मसंवादातून ही कादंबरी रेखाटली गेली आहे .

No comments:

Post a Comment