Wednesday, August 28, 2024

राजकीय हत्या

राजकीय हत्या 
पंकज कालुवाला
परममित्र पब्लिकेशन 
पंजाबचा गव्हर्नर म्हणून मायकल ओडवायरची नेमणूक झाली. पंजाबात अशांतता होती.
रोलेक्ट ऍक्ट कायदा लागू झाल्यामुळे असंतोष पसरला होता. ओडवायरने विमानातून जनतेवर गोळीबार केला त्यात पंधरा वीस लोक मारले गेले तरीही आंदोलन थांबले नाही.शेवटी त्याने जनरल डायरला बोलावून घेतले.जनरल डायर मुळातच खुनशी होता. 
बैसाखीचा सण पंजाबात उत्साहाने साजरा केला जातो .त्या दिवशी लोक जालियनवालाबागेत जमा झाले.एकच दरवाजा असलेल्या बागेत साधारण वीस हजार लोक जमा झाले होते.त्यात स्त्रिया लहान मुले वृद्ध यांचाही भरणा होता.जनरल डायर सैनिकांची तुकडी घेऊन  बागेत शिरला आणि त्यांनी जमावावर अमानुषपणे गोळीबार केला.गोळ्या संपल्या म्हणून गोळीबार संपला असे त्याने जबानीत सांगितले. 
या प्रकरणामुळे जनरल डायर आणि गव्हर्नर ओडवायर याना इंग्लंडला पाठविण्यात आले.पण उधमसिंह नावाच्या तरुणाने त्यांना शिक्षा करायची प्रतिज्ञा घेतली. त्यासाठी उधमसिंहने किती कठोर परिश्रम घेतले आणि कसे त्यांना मारले ???
थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद ब्रिटिशांची डोकेदुखी  बनले होते.त्यांची नेमबाजी अचूक होती.वेषांतर करण्यात ही पटाईत होते. काकोरी ट्रेन खजिना लुटण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. व्हॉईसरॉय लॉर्ड आयर्विन याना ट्रेनस्फोटातून ठार मारण्याचा त्यांचा प्रयत्न फसला आणि ब्रिटिश सरकार त्यांच्या मागे लागले . त्याचा मृत्यू राजकीय हत्याच आहे.
अफगाणिस्तानचे हफीझुल्लाह अमीन  सोव्हिएत युनियनच्या पाठिंब्यावर राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले पण नंतर त्यांचे धोरण आणि निर्णय सोव्हिएतला खटकू लागले त्यांनी अमीन याना ठार करण्याची योजना बनवली आणि ती अंमलात आणली.
शीख धर्मावर नेहमीच अन्याय होतोय अशी भावना त्यांची झाली होती. शिखांचे स्वतंत्र राष्ट्र असावे यासाठी त्यांनी लढा सुरू केला .त्यासाठी परदेशातील समुदायाने त्यांना आर्थिक मदत केली.
पण पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी ताठर भूमिका घेतली .खलिस्तानी नेते संत भिद्रनवाले सुवर्णमंदिरात ठाण मांडून बसले होते त्यांच्यासोबत 1500 अतिरेकी आणि प्रचंड दारुगोळा होता.शेवटी लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य यांच्या मदतीने ऑपरेशन ब्लू स्टार पार पडले .पण शिखांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांच्याच अंगरक्षकानी इंदिरा गांधी यांची हत्या केली.त्यासाठी कोण कसे तयार झाले .या कटाचे प्लॅनिंग कसे झाले ते वाचल्यावरच कळेल.
निवृत्त लष्करप्रमुख जनरल अरुण कुमार वैद्य यांची ही पुण्यात काही वर्षांनी हत्या झाली .
पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या तामिळ अतिरेक्यांनी आत्मघातकी बाँबने केली.त्यासाठी अनेक महिने तयारी चालू होती .
श्रीलंकेचे सॉलोमन भंडारनायके यांची  हत्या कशी केली ??
पाकिस्तानचे जनरल झिया उल हक तसेच बेनझीर भुट्टो यांच्या हत्येमागे कोण आहेत आणि कश्या अमलात आणल्या गेल्या.
लेखकाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहासाचा प्रचंड अभ्यास आहे.त्यांनी अतिशय बारकाईने सगळ्या गोष्टी मांडल्या आहेत.पुस्तक वाचताना लेखक जणू तिथे उभे आहेत असे वाटते.
यासर्व राजकीय हत्या का आहेत याची ही कारणे त्यांनी दिली आहेत. तसेच पुस्तक वाचताना कुठेही कंटाळवाणे होणार नाही याची काळजी घेतली आहे.
संदर्भासाठी घरी संग्रही असावे असे पुस्तक .

No comments:

Post a Comment