Thursday, September 14, 2023

अफवा

AFWAAF
अफवा 
अडचणीत सापडलेल्या तरुण मुलीला मदत करणे आपल्या जीवावर बेतेल हे रहाब अहमदला माहीत असते तर तो या वाटेला गेलाच नसता.
रहाब अहमद हा टेलिकॉम कंपनीचा सीइओ भारतात आलाय.राजस्थानातील एक छोट्या गावात त्याच्या पत्नीचा कार्यक्रम आहे. 
त्या रात्री भर रस्त्यात एका तरुणीला काही गुंड त्रास देत असताना तो पाहतो .तिला कोणीही मदत करत नसते म्हणून तो या घटनेचे विडिओ रेकॉर्डिंग करतो आणि इतरांनाही करायला सांगतो.
पण ते गुंड त्याच्यावरच हल्ला करतात. शेवटी ती तरुणी त्याचसोबत गाडीतून पळ काढते.निवेदिता उर्फ निवी नावाची ती तरुणी तेथील तरुण राजकारणी विकीची होणारी बायको तर तिथल्या मिनिस्टर ग्यानसिंहची मुलगी असते.
आता विकीची सगळी माणसे रहाब आणि निवीच्या मागे लागतात .या गोष्टीचा  फायदा आपल्या राजकीय प्रसारासाठी घेण्याचे विकी ठरवतो आणि एका मुस्लिम तरुणाने हिंदू तरुणीला लव्ह जिहादचा वापर करून पळवून नेल्याचा विडिओ आपल्या आयटी सेलमार्फत व्हायरल करतो. 
चंदन विकीचा सर्वात विश्वासू आणि इमानी माणूस आहे.विकीच्या निवडणूक प्रसारात त्याने एका मुसलमान कसाईची हत्या केली होती आणि तो व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि त्यातून सुटका होण्यासाठी विकीला हे लव्ह जिहादचे कारण मिळाले. दुसरीकडे चंदनला मार्गातून नाहीसे करण्यासाठी त्याने इंस्पेक्टर संदीप थोमारला नियुक्त केलेय. निवीचे वडील ग्यानसिंह त्या गावाचे राजे आहेत.त्यांचा हुकूम कोणीच मोडू शकत नाही.
योगायोगाने चंदन वाचतो आणि पळ काढतो.इथे रहाब आणि निवीही विकीच्या गुंडांपासून वाचण्यासाठी पळताय .आता संपूर्ण राज्यातच नाही तर देशात तो व्हिडिओ व्हायरल झालाय. आता रहाबला कसेही करून नहारगढ किल्ल्यात पोचायचे आहे. तिथे एक सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे आणि त्याची बायको तिथे आहे.
या घटनेवरून गावात हिंदू मुस्लिम दंगे चालू झालेत.या दंग्याचा आडोसा घेऊन रहाब आणि निवी नहारगढकडे निघालेत .त्यांच्या मागे विकीची माणसे लागली आहेत.वाटेत त्यांना चंदन भेटतो .चंदनच्या मागे इंस्पेक्टर संदीप आहेच. ते ज्या ट्रकमधून पळतायत त्याचा फोटोही आयटी सेलने व्हायरल केलाय.
आता रहाब ,निवी आणि चंदनची सुटका होणे अशक्य आहे .पण या गोष्टीचा अनपेक्षित शेवट होतो .तो काय असेल ते चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
आयटी सेलचा वापर गैरवापर कसा होतो. लोकांना भडकवून आपल्या फायद्यासाठी कसा वापर करावा . अति प्रामाणिकपणा आपल्याच जीवावर कसा बेततो. एक अफवा एखाद्याचे आयुष्य कसे उध्वस्त करू शकते यासाठी हा चित्रपट पहावा .
रहाब अहमदच्या प्रमुख भूमिकेत नवाझुद्दीन सिद्दीकी आहे .तर भूमी पेडणेकर निवेदिता सिंह बनली आहे.
सुधीर मिश्रा दिग्दर्शित हा चित्रपट नेटफिक्सवर आहे.

No comments:

Post a Comment