Tuesday, July 19, 2016

दशक्रिया

स्मशानात दशक्रिया विधीला जाणे म्हणजे एक छोटासा समारंभच असतो .जी माणसे विभागात राहूनही आणि कुटुंबात असूनही कधी भेटत नाहीत ती यावेळेला हमखास भेटतात .आमच्यात किंवा कोकणात भावकी म्हणतात .काही जण इतर कुठेही भेटणार नाहीत पण भावकीतल्या प्रेताला नाहीतर दशक्रीयेला भेटणारच .मला आठवतंय आमचे एक लांबचे काका त्यावेळी गिरणीत कामाला होते पण कोणाच्याही मरणाची बातमी त्यांना मिळाली कि अर्धा दिवस भरून घरी यायचे ,त्यांचे  या कार्यासाठी कपडे हि ठरले होते .ते कपडे घालून अंत्यविधीसाठी जायचे आणि सगळी सूत्रे हाती घ्यायचे .आम्हाला आजही आश्चर्य वाटते कि त्यांनी कधीच कामाची पर्वा केली नाही .नाहीतर आम्ही ताबडतोब रजेचे गोळाबेरीज चालू करतो ,कामाचा खाडा कसा करायचा याचीच काळजी जास्त आम्हाला .मी हि त्यातलाच आहे .माझा शाळेतला एक मित्र आहे .तो कधीच आमच्याबरोबर कुठे येत नाही पण कोणाचे देहवासन झाले कि हा कसाही हजर होतो .घरी आई वडील जिवंत असूनही तिरडी बांधायला पुढे असतो .अंत्यविधीच्या सर्व क्रिया आणि विधी तोंडपाठ प्रसंगी योग्य विधी होत नाहीत पाहून भांडायला हि तयार .खरेच आपण म्हणतो काय होणार या समाजाचे जिथे रडण्यासाठी माणसे भाड्याने बोलवावी लागतील .पण आजही अशी माणसे याच समाजात तयार होतायत .भले तिचे प्रमाण कमी असेल  पण  माणुसकी मारणार  नाही  अशी आशा आहे

No comments:

Post a Comment