अलक...५
जेवणाच्या वेळेलाच जिवलग मित्र घरी आलेला पाहून तो खुश झाला..आज बऱ्याच महिन्यांनी दोघे मित्र पोटभर गप्पा मारत जेवले.
"अरे ..उद्या एक काम करशील.प्रकाशकडे जाऊन माझे पेपर्स घेऊन ये. मी ऑफिसला जाणार आहे मला जमणार नाही.याच वेळेस जा.."
मित्र होकार देऊन बाहेर पडला. तो जाताच याने प्रकाशला फोन केला.
"उद्या त्याला तुझ्याकडे पाठवतोय . जेवल्याशिवाय सोडू नकोस . काम नाहीय त्याला.आपणच सांभाळून घेऊ . मी चाळीस मित्रांची लिस्ट काढलीय . खूप स्वाभिमानी आहे तो . पैसे घेणार नाही . पण रोज कोणाकडे काही कामासाठी पाठवून जेवणाची सोय तरी करू .. दोस्ती बडी चीज हैं .."असे म्हणत अलगद डोळे पूसले.
कॉलेजमध्ये असताना वाईट काळात एकमेकांना सांभाळून घेऊ या शपथेचा मान राखण्याची वेळ आज आली होती.
© श्री. किरण कृष्णा बोरकर
No comments:
Post a Comment