Sunday, July 12, 2020

गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आयुष्यात मला भेटलेली माझ्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती माझी गुरुच आहे. प्रश्न हा आहे.. की मी चांगला शिष्य आहे का ...?? 
आमच्या पिढीतील सर्वच पहिले गुरू आपले आई वडील आहे असेच सांगतात . दर गुरुपौर्णिमेला तेच ..  कारण त्यांनी संस्कारच असे दिलेत आपल्याला.मुख्य म्हणजे वेळ दिला . अगदी स्वतःची धुवायला शिकविण्यापासून कपडे कसे घालावेत...समाजात कसे वावरावे .. स्वतःची तयारी कशी करावी..?? इथपर्यंत सगळे शिकवले.
पण आताच्या पिढीचे पाहिले गुरू आईवडील आहेत का ...??  मूल झाले की आणि रजेचा पिरियड संपला की त्याची रवानगी पाळणा घरात ..
 मग त्याची पहिली गुरू पाळणाघरातील मावशी. नंतर  दोन वर्षांनी त्याच्या हाती स्मार्टफोन दिला जातो. भरपूर गेम डाऊनलोड करून . मग तो स्मार्टफोन त्याचा दुसरा गुरू होतो .तोच हळू हळू सगळे शिकवतो त्याला .
मला आठवतंय दरवर्षी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे गुरू भेटले . वयात आल्यावर मस्तराम आणि हैदोस वाचायला देऊन कामजीवनाची ओळख करून देणारा पहिला गुरू मित्रच होता . तर दारूची पहिली ओळख करून देणारा मित्र हाही गुरुच .स्वतः कितीही घाईत असलात तरी अडचणीत सापडलेल्याची मदत करूनच पुढे जावे हे शिकवणारा तो अपरिचित ही गुरुच असतो.
आम्हाला सर्व गुरू मानवी रुपात भेटले .पण हल्ली स्मार्टफोन तरुणाईचा गुरू झालाय . तोच त्यांना सर्व शिकवतो . त्यांच्यावर बरे वाईट संस्कार करतो . अगदी चार वर्षाच्या मुलांपासून ते नव्वदीच्या म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांचा गुरू असतो तो . लहानांना खेळ शिकवतो .गोष्टी सांगतो ,तरुणांना जे हवे ते देतो...अगदी त्यांना हवी तशी जोडीदार ही मिळवून देतो. वयस्कर लोकांना फायदे तोटे समजावून सांगतो . तर वृद्धांना एकटेपणात सोबत करतो .
पण यांच्याकडून चांगले वाईट काय आहे ते कोण समजावणार .....?? . काही म्हणतात वाईट काय ते समजायला चांगले काय ते आधी कळले पाहिजे .आणि ते समजवायला माणुसरूपी गुरुच पाहिजे .
आयुष्यात पाच मिनिटासाठी भेटलेली व्यक्ती खूप काही शिकवून जाते .म्हणून म्हणतो गुरू सर्वच असतात आपण चांगले शिष्य बनणे महत्वाचे असते .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment